नवी दिल्ली : देशाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं असून याचा निकाल आता ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. आगामी काही काळात लोकसभेची निवडणुक होऊ घातली आहे. त्यामुळे यानिकालात कोण बाजी मारणार ? त्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. यातच टिव्ही ९ आणि पोल स्टारने केलेले एक्झिट पोलनुसार धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
हेही वाचा…चिपळूनच्या पुलाचा भाग कोसळला, तोच कंत्राटदार, आदित्य ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरोम या राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं आहे. यातच एक्झिट पोलनुसार मध्यप्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. मध्यप्रदेशात भाजपचे मध्यप्रदेशाच्या २३० विधानसभा मतदारसंघापैकी भाजपच्या वाट्याला फक्त १०६ ते ११६ जागा येण्याची शक्यता असून याठिकाणी काॅंग्रेस बाजी मारणार आहे. काॅंग्रेसला याठिकाणी १११ ते १२१ जागा मिळणार असून बहुमताच्या आकड्या जवळ काॅंग्रेस पोहचणार आहे.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ‘याठिकाणी’ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण,” कार्यक्रमाची जय्यत तयारी
तर दुसऱ्या बाजूला राजस्थानमध्ये काॅंग्रेस आणि भाजपमध्ये काटे की टक्कर बघायला मिळणार आहे. राजस्थानमध्ये प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता बदल होत असते. त्यामुळे याठिकाणी काॅंग्रेसला धक्का बसण्याची शक्यता असून येथे भाजपचं सरकार स्थापन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण १९९ जागा पैंकी काॅंग्रेसला ९० ते १०० जागा तर भाजपच्या वाट्याला १०० ते ११० येण्याची शक्यता आहे. तर राजस्थानमध्ये अपक्षांना ०५ ते १५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींची गाडी राऊत बंधूंनीच फोडली, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
यातच छत्तीसगड मध्ये काॅंग्रेस सरकार कायम राहणार असून भाजपला पराभवाचा मोठा सामना करावा लागणार आहे. एकूण ९० जागांपैकी काॅंग्रेसला ४० ते ४५ जागा तर भाजपला फक्त ३० ते ३५ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तेलंगणात बीआरएस आणि काॅंग्रेसमध्ये काटे की टक्कर बघायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार भाजप तिसऱ्या क्रमांकावर असून काॅंग्रेस आणि बीआरएसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. तेलंगणात एकूण ११९ जागापैंकी काॅंग्रेसला ४९ ते ५९ जागा बीआरएसला ४८ ते ५८ जागा तर भाजपच्या वाट्याला ०५ ते १० जागा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मिझोरम मध्ये पुन्हा मिझो नागा पार्टीची सत्ता येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळे विनाकारण अजित पवार गटाकडून चुकीची माहिती अयोगासमोर मांडली जातेय,” शरद पवार गटाचा आरोप
हेही वाचा…“तर थू तुमच्या जिंदगानीवर”, प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“अजितदादा भेकड नाही तर मग याची उत्तरं द्या,” शरद पवार गटाचे अजित पवार गटाला ‘१०’ तिखट सवाल
हेही वाचा…संजय राऊतांनी राहत इंदौरींचा ‘तो’ शेर केला पोस्ट, तर्क वितर्कांना उधाण
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक, नाशकातील दौरा भुजबळांनी अर्धवट का सोडला ? छगन भुजबळ म्हणाले..,