कर्जत : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष रणनिती आखण्याची शक्यता आहे. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यानंतर मुंबईत आणि दिल्लीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका होणार आहेत. यातच आता कर्जत येथील मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या जागा लढविणार यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा…“..तर त्यांना भाजप तुकडे फेकणार नाही,” नितेश राणेंचा ‘बाडगा’ उल्लेख करत सुनील राऊतांची जहरी टिका
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तीन दिवसीय चिंतन शिबीर कर्जत येथे पार पडत आहेत. या शिबिरात अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, आपल्याला आता जोमाने काम करावं लागणार आहे. शिरूर, बारामती, सातारा, रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढविणार आहोत. तसंच ज्याठिकाणी ठाकरे गटाचे खासदार आहेत. त्या जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस अन् बीआरएसमध्ये काटे की टक्कर, शिंदेंनी भाजपसाठी प्रचार केला, भाजपला किती जागा ? एक्झिट पोल आला समोर
दरम्यान, काही गुन्हे दाखल झाले होते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असा आरोप होत आहे. परंतु हे सर्व चुक आहे. आरोप झाले म्हणजे ती वस्तुस्थिती आहे. असं समजू नका. कारण याआधी अनेकांवर आरोप झालेत. असंही अजित पवारांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी १३० जेसीबी तयार, १४० एकरवर सभा, पोलिस तैनात, जालन्यातील सभा वादळी ठरणार का ?
हेही वाचा…शनिशिंगणापुर देवस्थानमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार, बावनकुळे, कराडांची उपोषणस्थळी भेट, म्हणाले…
हेही वाचा…“मंत्री छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी, सलग १२ मॅसेज पाठवून..,” राजकारण तापणार
हेही वाचा…मावळसाठी मीच उमेदवार असणार !श्रीरंग बारणेंनी जाहीर केली उमेदवारी, भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय ?
हेही वाचा…शिरुरसाठी आंबेगाव ‘किंगमेकर’ : दोन दोस्त ठरवणार कोण होणार खासदार?