मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत वादळी सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तब्बल तीन दिवस ही सुनावणी न्यायालयात होणार असून निवडणुक आयोगाबाबत ठाकरेंनी केलेल्या याचिकेवर उद्या होणार आहे. त्याआधी शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी सध्या न्यायालयात झाली. या सुनावणीत एकनाथ शिंदें यांच्यावर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असतांना त्यांना राज्यपालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कशी दिली ? असा सवाल कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे. त्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे.
हेही वाचा..“आता विकास हवा, तर बॅट चा नवा पर्याय निवडा..! निळ्या शक्तीची ताकद दाखवा”, अपक्ष उमेदवार किशोर काशीराम यांचं आवाहन
निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकारिणीची सभा बोलवली आहे. या सभेमध्ये एकनाथ शिंदे कोणतं पद घेतात ? उद्धव ठाकरेंकडे असलेल्या पक्षप्रमुखपदाबाबत काय निर्णय होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच विधानपरिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेते आहे, पण या पदावरही ठाकरे गटाला पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“आसाम मध्ये बसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले”? न्यायालयात ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
निवडणुक आयोगाच्या निकालानंतर अंबादास दानवे हे सत्तापक्षाचा भाग झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर ठेऊ नये, अशी भूमिका शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते, तसे झालं तर अंबादास दावने यांचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकतं. यातच आता शिंदे गटाकडून व्हीप सोडला तर विधान परिषदेच्या आमदारांना अडचणी निर्माण होऊ शकते. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.
हेही वाचा…““कसब्यातून निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा सात मजली करणार”, हेमंत रासनेंची मोठी घोषणा
यातच शिवसेना पार्टीचा फंडाला धोका येऊ शकतो. म्हणून ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. त्यावर दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी सेनेची घटना बदलली आणि हक्क स्वत: घेतले. शिवसैनिकाचे पैसे स्वत:च्या नावावर वळविले हे चुकीचे आहे. आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करणार, आदरापोटी आम्ही शांत आहोत. सहानुभूती निर्माण करणे आता बस झाले, आम्ही सहा महिन्यात काय केलं ते दाखवतो, तुम्ही अडीच वर्षात काय केलं दाखवा, शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत, असा आमच्याविरोधात एक गैरसमज पसरवला जात आहे. पंरतु कसे काही नाही, आम्हाला यापैकी काहीही नको उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं केसरकरांनी सांगितले.
Read also
- “अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असलेल्या शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली”
- हेही वाचा..“पोटनिवडणुकांमध्ये लोकांचा आशीर्वाद आम्हालाच मिळणार”, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
- हेही वाचा…“युवराज पार्थ पवार यांच्यासाठी मावळ ‘सेफ’ करण्याची रणनिती”
- हेही वाचा..मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून मला मारण्याची सुपारी, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
- हेही वाचा..““आश्वासने पुर्ण करू शकलो नाही तर माझ्यावर खटला दाखल करा,”, अपक्ष उमेदवार सिद्दीकभाई शेख यांनी जाहीर केला आपला जाहीरनामा