पुणे : चिंचवड मतदारसंघात झोपडपट्टीत राहणारा दलित समूह सध्या वाळीत टाकल्यासारखं जगत आहे. हे भयानक चीड आणणारं असून सर्वच पक्षांना आम्ही विचारतोय स्मार्ट सिटीसाठी आलेल्या ५२० कोटी रूपयातील एक रूपया तरी झोपडपट्टी स्मार्ट करण्यासाठी लावला का ? आजही जातीयतेचा आलेखाने विकास केला जात नाही. जे आमदार, नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यांनी त्यांच्याच वॉर्डात झोपडपट्टीचा विकास करून दलितांना मुख्य प्रवाहात का आणले नाही. जातीयवाद्यांना निळा रूमाल गळ्या घालून, गाडीला लावून फिरण्याचा नैतिक अधिकार आहे का ? असा सवाल ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ऑल इंडिया पॅंथरकडून किशोर आत्माराम काशीराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…कसब्यात भाजपाचा विजयाचा संकल्प.! संजय काकडे यांच्या वतीने भव्य विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती म्हणजे ‘आम्ही चौघे भाऊ, मिळून मिसळून खाऊ’ अशी झाली आहे, आज निवडून येणारे उद्या भाजपमध्ये जाणार नाही याची काय खात्री द्याल.? अनुसूचित जाती- जमाती घटक एकवटला आहे, विजय बॅट चाच होणार, दलितांचा पाठींबा चालतो, पण त्यांना संधी कुणी देत नाही. विधानसभा गठीत झाल्यापासून एकदाही याठिकाणी बौद्ध, आदिवासी उमेदवाराला संधी देण्यात आली नाही. एवढचं नाही तर पाठिंबा घ्यायला फिल्डिंग लावतात. पण आंबेडकरी पक्षाची उमेदवारी घेऊन लढायला लाज वाटते ही आमच्याबद्दल तुच्छतेची भावना आहे. सध्या राजकीय नेत्यांच्या सभेमध्ये एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. पण जनतेच्या प्रश्नावर कुणी भाषण करायला तयार नाहीत. त्यांनाही आता तेच तेच खोट बोलण्याची लाज वाटायला लागली आहे. प्राधिकरण हद्दीतील सातबारा देण्याची ग्वाही देणारे भाषण आजही युट्युबवर आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन नावाखाली एसआरए आणली. ती योजना माणसांना जनावरांसारखं कोंडणारा आहे. ३०० स्क्वेअर फुट लोकप्रतिनिधींचे बाथरूम आहेत. एवढ्या जागेत एक कुटुंब कसे राहणार? ही प्रक्रिया जनावरासारखी जगणं देणारी आहे. बिल्डर राजकारणी शोषित घटकांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. रोजगाराच्या शोधात आलेल्या स्थलांतरीतांना कुत्रा-मांजरासारखी वागणुक दिली जाते. दबाव, भीती शोषण हेच त्यांच्या वाट्याला आतापर्यंत आलं आहे. आर्थिक शोषण कंत्राट वर्ग करतो, जो याच राजकारण्यांचा पाळीव असतो. त्यांच्या घामाचा कष्टाचे पैसे लुटण्याचे काम महागडे भाडे घेऊन केला जातो. असा हल्लाबोल देखील केदार यांनी केला.
हेही वाचा…““२०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा”, चंद्रकांत पाटलांचं आवाहन
गरिबांना घर देणारी पीएम योजना कुठे आहे? आमच्यासाठी हा शोषित घटकांना स्वतंत्र भारतात मुक्तपणे हक्क अधिकाराने जगता यावं म्हणून आमचं हे राजकीय पाऊल आहे. देशातील आशिया खंडातील सर्वात मोठी बजेट असलेल्या महानगरपालिका यादीतील पिंपरी चिंचवड येथे आज सोसायटीने गेटवर पाणी नाही, तर मत नाही म्हणत मतदानावर बहिष्कार टाकला आहे. ही घटना देशाला हादरवणारी आहे. त्याच या राज्यकर्त्यांना विरोधकांना सोयरसुतक नाही, एवढे हे असंवेदशील राजकीय खेळाडू झाले आहेत. आजवर केवळ गप्पा, भ्रष्टचार, बागुलबुवा, फुगवलेला फुगा यापलीकडे काहीही झालेलं नाही, जात आणि पैसे या बळावर आम्ही काहीही करू हा न्युनगंड येथील नेत्यांना झाला आहे. मतदार क्रांती करेल तेव्हा हे खडबडून जागे होतील. सफाई कामगार ९९ टक्के दलित गरीब आहे. कोरोना काळात तो नसता तर पिंपरी चिंचवड सोडा, संपुर्ण राज्याचे अस्तित्व धोक्यात आले असते. त्या सफाई कामगारांना घर नाही, तो यांच्यासाठी वॉरियर्स नाही का? तर तो स्थलांतरीत दलित असतो. पिंपरी चिंचवडमध्ये विकासाचा दृष्टीकोन जातीय झाला आहे. म्हणून या भागातील दलित -मुस्लिम घटक नाकारला गेलाय. ऑल इंडिया पॅंन्थर सेना, शोषित घटक, बेरोजगार, मजूर, राज्यभरात होत असलेले अन्याय, अत्याचार, महिला सुरक्षा, दोन्ही व्यवस्थेकडून धोक्यात आलेले संविधान वाचवण्यासाठी सर्व घटकांना प्रश्नांना न्याय देण्यासाठी, आंबेडकरवादी राजकीय अस्तित्व निर्मितीसाठी हा लढा आहे. आम्ही प्रचारानिमित्त झोपडपट्टी भागात गेलो. त्यांच्या वेदना समजून घेतल्या. राज्यकर्त्यांच्या जातीयतेचे आम्ही बळी गेलेलो आहोत. विकास त्या भागातून फरार झाला आहे, तो फरार करणारे जातीय मानसिकतेचे आहेत. त्यांना एक्सपोस करून अस्तित्व निर्माण केल्यास येते विजय आमचा आहे. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा..“२०२४ च्या निवडणुकीनंतर ठाकरेंसोबत फक्त किंचित सेना असेल”, भाजपने ठाकरेंना डिवचलं
निवडणूक आयोगाने चोक भूमिका बजावल्यास पैसा वाटप थांबवल्यास विजय आमचा होईल. याठिकाणी लढणारे “लोकनेते” नाही तर “पैसानेते” आहेत, त्यांनी पैसा बाजूला करून मैदानात उतरावे आमच्यापुढे ते टिकू शकत नाहीत. आडणीचे मानसपुत्र म्हणून काही मंडळी फिरत आहेत, ज्यांनी हिंडनबर्ग रिपोर्ट नंतर गौतम अडाणी उदोजकाची पाठराखण केली, असा युवा नेत्यांना खरंच गरिबांच्या प्रश्नांची जाण असेल का हा प्रश्न पडलाय? शब्दांचे राजकारण केले जाते, पाठींबा मात्र भांडवलदार प्रस्थापितांना दिला जातो. आमच्या उमेदवाराला चळवळीचा समाजाचा उमेदवार म्हणून पाठींबा दिला नाही, याची चर्चा समाजात नक्की होणार. भाजपची व्यवस्था घालवण्यासाठी केवळ आंबेडकरवादी लढतो बाकी सगळे नाटक आहेत. आज लढणारे उमेदवार उद्या भाजपमध्ये जाणार नाहीत याची ग्वाही कुणी देईल का? भाजपला हरवायचं म्हणणारेच गुवाहाटीला जाऊ नयेत म्हणजे झालं. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत स्थानिकांवरील अविश्वास हेच राष्ट्रवादीच्या अपयशाचे कारण..!
आम्ही चौघे भाऊ मिळून मिसळून खाऊ” हि स्थिती महाराष्ट्राने ओळखावी, तरच परिवर्तन होईल. बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा, आरोग्य, पाणी प्रश्न, दलितांचे प्रश्न, महापुरुषांचा अवमान असे अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हि राजकीय भूमिका आहे. किशोर आत्माराम काशीकर हा आंदोलक अपक्ष उमेदवार ज्यांची निशाणी बॅट आहे ती गरीब, शोषित घटकांच्या मतावर विजयी होणार. प्रश्नांना उत्तर देताना केदार यांनी सांगितले की तिरंगी चौरंगी नाही तर दोन रंगी लढत आहे, दुसरा नंबर आमचा आहे. विजय खेचून आणू. २३ फेब्रुवारी २०२३ ला सायंकाळी काळेवाडी भागात जाहीर प्रचारसभा होणार आहे. यावेळी उमेदवार काशीकर यांनी सांगितले की, आंदोलक कार्यकर्ताच समाजाचे, जनतेचे प्रश्न समजू शकतो त्यामुळे मलाच लोक मतदान करतील ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले यावेळी उमेदवार किशोर आत्माराम काशीकर उपस्थित होते.
Read also
- “आसाम मध्ये बसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले”? न्यायालयात ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
- हेही वाचा…““कसब्यातून निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा सात मजली करणार”, हेमंत रासनेंची मोठी घोषणा
- हेही वाचा..““पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभावाची भीती, म्हणूनच पाच मंत्री पुण्यात,” थोरांताचा भाजपवर हल्लाबोल
- हेही वाचा..“कसब्यात प्रचंड प्रतिसाद, आपला विजय निश्चित”, हेमंत रासनेंच्या पदयात्रेत पंकजा मुंडेंचं विधान
- हेही वाचा..““आपल्याला कसबा बदलून दाखवायचा आहे आणि तो आपण बदलणारच,”