मुंबई : निवडणुक आयोगाने काल शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केला आहे. याचा जोरदार फटका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसला आहे. त्यावरून राज्यातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगावर जहरी टिका करत त्यांच्या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा..““एकनाथ शिंदेंनी आता त्यांचा ‘बाप’ ही बदलला, त्यांचा नाव बाप अमित शहा “
उद्धव ठाकरे घरात बसून देशातील लोकशाहीची चिंता तुम्ही करू नका. लोकशाहीचा पाया मजबूत आहे. त्यामुळेच ४० आमदार सोबत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव मिळालं. १५ आमदार असलेला तुमचा गट अस्तित्व शोधतोय, आणि हो तुम्ही हुकूमशाहीच्या गप्पा मारू नका. हे मात्र खरं आहे की, २०२४ च्या निवडणुकीनंतर तुमच्यासोबत फक्त किंचित सेना असेल. असा खोचक टोलाही त्यांनी हाणला आहे.
हेही वाचा..कसब्यात आज राजकीय वाकयुद्ध..! शिंदे अन् फडणवीस तर दुसऱ्या बाजूला अजित पवार, बाळासाहेब थोरात
देशातील लोकशाही आता जिवंत ठेवण्यासाठी काही केलं नाही तर देशात असणारी लोकशाही ही १५० वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीनंतर फक्त ७५ वर्षेचं देशात शिल्लक राहिली होती का? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. २०२४ ही लोकसभेची कदाचित शेवटची निवडणुक असू शकेल. कारण त्यानंतर हुकूमशाहीला सुरूवात होणार आहे. आपल्या लोकशाहीत एक मोठं दुर्दैव असं आहे की, पक्षांतर्गत निवडणुक पाहिजे, देशात निवडणुक पाहिजे. सगळ्या गोष्टी जर निवडणुकीने होतात आणि निवडणुक आयुक्त मात्र नेमणुकीने ठरत असेल तर लोकशाहीचा मूळ गाभा धोक्यात आहे. असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत स्थानिकांवरील अविश्वास हेच राष्ट्रवादीच्या अपयशाचे कारण..!
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, ठाकरेंची पुढची भूमिका ठरली “?
- हेही वाचा…उध्दव ठाकरेंच्या आधी एकनाथ शिंदेंनी गाठलं निलम गोऱ्हेंचं घर, निलम गोऱ्हेंना आज मातृशोक
- हेही वाचा…“राणेंचे दोन चिल्लर चार आणे भेकड, टिल्ल्यांनो, अजित पवारांचं नाव घेण्यापुर्वी 1000 विचार करा,” राष्ट्रवादीने डिवचलं
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीवरून आनंद दवेंच्या सहकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप, म्हणाले…”