मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत वादळी सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तब्बल तीन दिवस ही सुनावणी न्यायालयात होणार असून निवडणुक आयोगाबाबत ठाकरेंनी केलेल्या याचिकेवर उद्या होणार आहे. त्याआधी शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीत एकनाथ शिंदें यांच्यावर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असतांना त्यांना राज्यपालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कशी दिली ? असा सवाल कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे.
हेही वाचा…““२०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा”, चंद्रकांत पाटलांचं आवाहन
सुरूवातीला कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना नावांसंदर्भात युक्तिवाद केला. परंतु न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास नकार दिला, त्याआधी तुम्ही बाकीच्या याचिकांवर बोला असं न्यायालयाने म्हटलं. त्यानंतर या युक्तिवादासाठी तीन दिवस लागणार आहे. असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. त्यावर तुमचा सर्व युक्तिवाद आजच संपवा , असं सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या वकिलांना सांगितलं.
हेही वाचा..“२०२४ च्या निवडणुकीनंतर ठाकरेंसोबत फक्त किंचित सेना असेल”, भाजपने ठाकरेंना डिवचलं
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात राज्यपालांकडून अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई न्यायालयात सुरूअसतांना राज्यपालांनी अपात्र आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ कशी दिली ? तसेच आसाममध्ये राहून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले? असा सवालही कपिल सिब्बल यांनी केला. तसेच या संपुर्ण प्रकरणासाठी शिंदे गटाने तीन राज्यांची मदत घेतली असंही त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर तसेच राज्यपालांच्या या निर्णयावर कोर्ट विचार करू शकतं. असंही त्यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत स्थानिकांवरील अविश्वास हेच राष्ट्रवादीच्या अपयशाचे कारण..!
दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्ष निवडीवरून देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टात प्रश्न उपस्थित केला आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकावर निकाल लागला असता. तर राहुल नार्वेकर यांच्या विधान सभा अध्यक्षांच्या निवडीवर झाला असता. त्यांना यामध्ये कमी मतं पडली असती. असंही कपिल सिब्बल यांनी केला आहे. काही आमदार या निवडणुकीच्या वेळी अनुपस्थितीत होते. त्यामुळे गोंधळ झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…““कसब्यातून निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा सात मजली करणार”, हेमंत रासनेंची मोठी घोषणा
- हेही वाचा..““पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभावाची भीती, म्हणूनच पाच मंत्री पुण्यात,” थोरांताचा भाजपवर हल्लाबोल
- हेही वाचा..“कसब्यात प्रचंड प्रतिसाद, आपला विजय निश्चित”, हेमंत रासनेंच्या पदयात्रेत पंकजा मुंडेंचं विधान
- हेही वाचा..““आपल्याला कसबा बदलून दाखवायचा आहे आणि तो आपण बदलणारच,”
- हेही वाचा…कसब्यात भाजपाचा विजयाचा संकल्प.! संजय काकडे यांच्या वतीने भव्य विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन