मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला होण्याची भिती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे माझ्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी या हल्ल्याबाबत मुंबई आयुक्तासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे यावर आता राजकीय वर्तुळातून एकच प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत.
हेही वाचा..“कसब्यात प्रचंड प्रतिसाद, आपला विजय निश्चित”, हेमंत रासनेंच्या पदयात्रेत पंकजा मुंडेंचं विधान
राऊतांनी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पुर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामानाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहोत. असं राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..““आपल्याला कसबा बदलून दाखवायचा आहे आणि तो आपण बदलणारच,”
संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर राज्यातील राजकीय नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी जे आरोप केले आहेत. त्याची चौकशी व्हायला हवी. असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तर मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यात येईल. त्याची संपुर्ण चौकशी केली जाईल. यातून सत्य बाहेर येईलच परंतु त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली असल्याने त्यांना पुन्हा सुरक्षा देण्यात यावी, यासाठी त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचंही देसाई यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा..““आश्वासने पुर्ण करू शकलो नाही तर माझ्यावर खटला दाखल करा,”, अपक्ष उमेदवार सिद्दीकभाई शेख यांनी जाहीर केला आपला जाहीरनामा
- हेही वाचा..“आता विकास हवा, तर बॅट चा नवा पर्याय निवडा..! निळ्या शक्तीची ताकद दाखवा”, अपक्ष उमेदवार किशोर काशीराम यांचं आवाहन
- हेही वाचा..“आसाम मध्ये बसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले”? न्यायालयात ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
- हेही वाचा…““कसब्यातून निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा सात मजली करणार”, हेमंत रासनेंची मोठी घोषणा
- हेही वाचा..““पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभावाची भीती, म्हणूनच पाच मंत्री पुण्यात,” थोरांताचा भाजपवर हल्लाबोल