पुणे : नृत्यांगना गौतमी पाटीलच नाव माहित नाही, असा व्यक्ती महाराष्ट्रात सापडणार नाही. गेल्या काही काळापासून संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीची प्रचंड क्रेझ पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे तिच्या नृत्यावरून टीका देखील होतेय, याध्ये आता तिच्या आडनावावरून मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे. पाटील हे गौतमीचे खरे आडनाव नसून तिने पाटील आडनाव लावू नये, असा वाद सुरू झाला आहे. यावर आता अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा…संजय शिरसाट यांना ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट, अहवाल प्राप्त झाला नसल्याची महिला आयोगाची प्रतिक्रिया
“गौतमी पाटीलचे वय अजून लहान असल्याने एवढे यश पचवणं फार अवघड आहे. लोकांनी उलट तिला मदत करायला हवी. ग्रामीण भागातील तरुण त्यांच्या अदांवर फिदा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची एक मुलाखत मी पहिली होती, यामध्ये तिने कुटुंबाची परिस्थिती सांगितली होती. त्यामुये ज्यावेळी त्यांची हालाखीची परिस्थिती होती, त्यावेळी आज ट्रोल करणारे गौतमी पाटील यांना दोन वेळेचं अन्न द्यायला जात नव्हते. त्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण?” असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. ‘टिव्ही९ मराठी’शी ते संवाद साधत होते.
हेही वाचा…“शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना पुढच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार”
दरम्यान, समाजाने गौतमी पाटीलच्या कलेचा आदर करायला हवा, तसेच यशाच्या शिखरावर असताना तिला पाठींबा दिला पाहिजे, असे मत अमोल कोल्हे यांनी वक्त केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रूपाली चाकणकर म्हणताहेत.., “आता विधानसभा लढवायचीय, अजित दादांकडून उमेदवारी मागणार”
हेही वाचा…शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत इनकमिंग सुरूच, शिंदे गटात मुंबईतील शिवसैनिक दाखल
हेही वाचा…मध्यरात्री राज ठाकरे-फडणवीसांची भेट…! दुसऱ्याच दिवशी भाजपने मनसेला पाडलं खिंडार, एकच चर्चा
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना शिवसेना राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना १०० कोटींची ऑफर”, भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा