मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २२ ऑक्टोंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्याआधी मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर लढाई अर्ध्यावर टाकून जाऊन नका असं मराठा मोर्चेचे समन्वयक विनोदी पाटील यांनी आवाहन केलं आहे.
हेही वाचा…“ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर”, आतापर्यंत ७०० ते ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय असलेले सुनील बाबुराव कावळे याने मुंबईतील द्रुतगती मार्गावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील कावळे हे जालना जिल्ह्यातील अंबडचे रहिवासी आहेत. यातच माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवयय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. असं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, इडीचं धाडसत्र सुरू, अनेक ठिकाणी छापेमारी
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. असा इशाराही विनोद पाटील यांनी दिला आहे.
आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली.
माझ्या मराठा बांधवांनो,
आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई…
— Vinod Patil (@vnpatilofficial) October 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! नाशकातून ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, राहण्यासाठी घेतले होते 25 लाख
हेही वाचा…अजित पवारांना मराठा समाजाने घातली बंदी तर शरद पवारांची होणार ग्रॅंड एंन्ट्री
हेही वाचा…ललित पाटीलने तोंड उघडलं तर कोण अडकणार ? राज्यातील ‘या’ नेत्यांची नावे हिटलिस्टवर
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या..! रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला १३७ कोटीची नोटीस, नेमकं प्रकरण काय आहे ?
हेही वाचा…निष्ठावंत असायला हवा तर असा..! 40 वर्षापासून असलेल्या ‘या’ नेत्यांनी राजीनामा दिला, पण ठाकरे गटातच राहणार