मुंबई : मुंबई ड्रग्स केसवरून समीर वानखेडे यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झालेले नवाब मलिक ठरावीक वेळाने वानखेडेंबाबत गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, आज सकाळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वादात दररोज नवनवे आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. नवाब मलिक यांनी आज सकाळी दोन ट्विट करून समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत अजून माहिती समोर आणली आहे.
On Thursday 7th December 2006 8 pm,a Nikah was performed between Sameer Dawood Wankhede and Sabana Qureshi at Lokhand Wala complex, Andheri (west) mumbai.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे झाला होता. या निकाहामध्ये ३३ हजार रुपयांचा मेहेर देण्यात आला. तसेच समीर वानखेडेंची बहीण यास्मिन दाऊद वानखेडे हिचे पती अझीझ खान हे साक्षीदार क्रमांक २ होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
Meher amount was Rs.33000. Witness no 2 was Aziz Khan Husband of Yasmin Dawood Wankhede elder sister of Sameer Dawood Wankhede.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
दरम्यान, गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना अडचणीत आणले आहे. काल नवाब मलिक यांनी एनसीबीमधील एका अधिकाऱ्याचे निनावी पत्र शेअर करत समीर वानखेडे यांची कार्यपद्धती आणि त्यांनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित कले होते. एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर मी ट्विटरवरून प्रसिद्ध केला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती मी केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.
Photo of a Sweet Couple
Sameer Dawood Wankhede and Dr. Shabana Qureshi pic.twitter.com/kcWAHgagQy— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
नवाब मलिक यांना पाठवलेल्या पत्रामधून एनसीबीच्या या अधिकाऱ्याने समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या २६ खटल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच वानखेडे यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे प्रसिद्धीलोलूप अधिकारी आहेत. त्यांना माध्यमांमध्ये चर्चेत राहणे आवडते. त्यासाठी समीर वानखेडे यांनी अनेक निर्दोष लोकांना बनावट एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे, असा दावा या पत्रातून करण्यात आला होता.
Read Also :
- विधानसभा अध्यक्षांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू; महाविकास आघाडीला आमदार फुटण्याची भीती!
- तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं योग्य नाही; आरोप लागले आहेत तर चौकशी करा – देवेंद्र फडणवीस
- महाविकास आघाडी सरकारने औकातीत राहावं, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; भाजप आमदाराने भरला दम
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक; सायबर सेलकडे तक्रार
- देवाकडून बंद होणारा ऑक्सिजन पुरवठा मीच सुरू केला, असंही उदयनराजे म्हणतील – शिवेंद्रराजेंचा घणाघात