नागपूर : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी सुरूवातीलाच भुखंड प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. त्यानंतर लगेचच शिंदे गटातील लोकसभेचे नेते राहूल शेवाळे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप लावले. त्यानंतर राज्याच्या विधान सभेतही त्याचे जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर सभागृहात दोन्ही बाजूंनी जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यावरून भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तुमच्यावर दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून आरोपांचे डाग लावले जात आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, डाग नाही, आमचे पट्टे आहेत वाघाचे ते आम्ही दाखवतो. हे बदनामीचं षडयंत्र आहे. आधी बदनामी करायची त्याच्या अर्धा दिवस बातम्या चालतील आणि दुपारनंतर म्हणजे जेवणानंतर जंयत पाटील यांना निलंबित करायचं. म्हणजे त्यांच्यावर बातम्या चालतील ही त्यांची रणनीती होती. मुख्यमंत्र्यांचा भुखंड घोटाळा आणि एनआयटी लपवण्याचा या मागे त्याचा डाव आहे. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“बोम्मईंवर महाराष्ट्रात खटला करून दाखवा”; राऊतांचं शिंदे-फडणवीसांना आवाहन
तसेच दिशा सालियनचा मृत्यू झालं होतं. त्या दिवशी माझे आजोबाचं त्या दिवशी निधन झालं होतं. ही सत्य गोष्ट आहे. मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळी. तरीही आरोप होत आहेत. त्यांना हे काढायचं आहे, ते काढू द्या. पण एक सत्य आहे की, 32 वर्षांच्या तरूणाला हे सरकार घाबरलेलं आहे. त्यांचा घोटाळा काढून महाविकास आघाडीने हे सरकार हादरवून ठेवलं आहे. म्हणूनच हे घाबरलेले आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Read also
- “दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही निघत नाही”
- “गेली चार दिवस मी सभागृहात घसा फुटेपर्यंत ओरडतोय, पण..;” आव्हाडांची नाराजी
- राजकारण तापणार…! फडणवीसांवर सोमवारी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव
- “वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर..;”राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- नागपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची पावलं मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेली अन्