मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालीयन प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्यांची मालवणी पोलीस ठाण्यात 5 मार्च ला चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दिलासा मिळत असून त्यांचा अटकपुर्व जामीन मंजूर झाला आहे.
शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला खाली खेचणार; वीजकापणीवरून माजी ऊर्जामंत्र्याचं वक्तव्य
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांची मालवणी पोलीस ठाण्यात दोघांची चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांनी दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नारायण राणे म्हणाले होते की, सुशांत आणि दिशाच्या हत्येनंतर मला मुख्यमंत्र्यांचे दोन फोन आले, त्यांच्या सोबत झालेल्या त्या संवादाची माहिती मी पोलिसांना दिली. मात्र त्याची नोंद करून घेण्यात आली नाही. शेवटला नारायण राणे असेही म्हणाले की,दिशा सालीयन ला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे सत्य पुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही करू.
गावसकर, सचिन विराटसारखे दिग्गज संन्यास घेतात; मग काॅंग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का नाही?
दिशा सालीयन प्रकरणी आज मात्र पितापुत्रांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दिंडोशी सेशन न्यायालयात त्यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मंजूर झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी आणि शर्ती सुद्धा ठेवल्या आहेत, असंही यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार झुकती है! बस झुकानेवाला चाहिए
लोकशाही मध्ये आम्हा लोकप्रतिनिधीना जे काही अधिकार दिले आहेत, त्यांचे आम्ही नक्कीच पालन करू.कुणावरही अन्याय होत असेल तर त्याला न्याय देण्याचे काम आम्ही करतो.ते अधिकार आज न्यायालयाने कायम ठेवले त्यासाठी न्यायालयाचे मी आभार मानतो, असे नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. राज्यातील काही मंत्री या प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विनाकारण आमच्या विरोधात षड्यंत्र रचत आहे आणि आम्हाला मुद्दाम त्रास देत आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी CBI कडे देण्याची आम्ही मागणी करणार आहोत, असेही नितेश राणेंनी सांगितले.
Read also:
- काश्मिर पंडितांची वेदना जेवढी शिवसेनेला माहित आहे, तेवढी अन्य कुणालाही नाही: संजय राऊत
- “जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे”; संजय राऊतांची काॅंग्रेसवर खरमरीत टीका
- मराठीच्या मुद्द्यावरून मनसेचं पुन्हा ‘खळखट्याक’; आयपीएलसाठी परराज्यातून आणलेल्या सर्व बसेस फोडल्या
- अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार
- “एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी द्या! सरकार कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो”