मुंबई : काॅंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एका मुलाखती दरम्यान काॅंग्रेसचे नेतृत्व दुसऱ्याकडे द्यावं असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यांची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर त्यांनी नेतृत्वाबाबत सुनिल गावसकर, सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीचे देखील नाव घेतलं आहे. कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यांमुळे काॅंग्रेसच्या नेतृत्वाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
कपिल सिब्बल म्हणाले की, याठिकाणी आपण सुनिल गावसकर यांच्यासोबत काम करीत नाही. सचिन तेंडूलकरलाही क्रिकेटमधून सन्यास घ्यावा लागला. कालपरवापर्यंत विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. त्यानेही आता तिन्ही क्रिकेट प्रकरातून नेतृत्वाची जबाबदारी दुसर्याकडे दिली आहे. तिघांचीही नावं इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिली जातील. त्यांना एक दिवस सन्यांस घ्यावा लागला. त्यानंतर तरी नेतृत्वाने आपली जागा दुसऱ्यांना दिली पाहिजे. निवडून आलेला असेल किंवा नियुक्त केलेला असेल अशा व्यक्तीकडे नेतृत्वाची धूरा दिली पाहिजे त्याला नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे. असंही ते म्हणाले.
बच्चू कडूंचं नाव निजामुद्दीन शेख तर पटोलेंचा अमजद खान; वळसे पाटलांनी केला घटनेचा उलगडा
मागच्या वर्षी म्हणजे 2020 ला देखील काॅंग्रेसच्या जी-20 गटाने काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना काॅंग्रेस नेतृत्वाबाबत पत्र लिहिलं होतं. सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी कपिल सिब्बल यांचं नाव देखील होतं. मी सर्वांच्या वतीने बोलू शकत नाही. परंतु मी माझं वैयक्तिक मतं मांडलं आहे. काहींना घर का काॅंग्रेस असा पक्ष हवा आहे. परंतु मला सब की काॅंग्रेस असं हवं आहे. सब की काॅंग्रेस याचा अर्थ फक्त असा होत नाही की, सर्वांनी एकत्र येणे. पंरतु त्याचा अर्थ असा होतोय की, देशात ज्यांना भाजप नको आहे, अशा लोकांनी एकत्र येणे होय.
“घर का काॅंग्रेस नकोय, सब की काॅंग्रेस हवंय”; ज्येष्ठ काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य
महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेस सध्या सत्तेत आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काॅंग्रेसचाच मुख्यमंत्री असल्याचा दावा काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच पुणे, ठाणे, मुंबई आणि नाशिक या प्रमुख शहरात येत्या काही महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच देशात लोकसभेच्या देखील निवडणुका आहेत. त्यामुळे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल बघता आणि महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काॅंग्रेस कशाप्रकारे कामगिरी करतोय. ते पहाणं आता महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- महाविकास आघाडी सरकार झुकती है! बस झुकानेवाला चाहिए
- ” दरेकरांनी त्यांचं नाव बदलून दरोडेखोर ठेवावं”; नाना पटोलेंची दरेकरांवर जहरी टीका
- भाजपला ते आंदोलन भोवलं; भाजपच्या आमदारासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- ” दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीने नव्हे तर सडक्या बुद्धीने “; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर घणाघात
- मलिकांचा राजीनामा घ्या; नाही तर ठाकरे-पवार सरकारने सरकारी जावई घोषीत करा: राम सातपुते