औरंगाबाद : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीस बदल्यांचा घोटाळा बाहेर काढल्यासंदर्भात पोलीस सायबर सेलने नोटीस बजावली होती. तसेच त्यांची यासंदर्भात देखील चौकशी करण्यात आली. या घटनेवरून भाजपने राज्यात आक्रमक पवित्रा घेतला होता. औरंगाबाद येथील क्रांती चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात केले होते. मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण दाखवत भाजपचे आमदार अतुल सावे, शहाराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवाब मलिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर शहरात रविवारी क्रांती चौकात आंदोलन केले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने त्याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे प्रचंड संख्येने गर्दी जमवून कोराना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर आता भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली आहे.
ईडीच्या कारवाई प्रकरणी नवाब मलिकांना उच्च न्यायालयचा झटका ; याचिका फेटाळल्याने मलिक अडचणीत
अतुल सावे पुढे म्हणाले की, लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी तसेच आमच्या आमच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठावला तर आम्ही तुम्हाला पोलीस व सरकारी वकिलांमार्फत षडयंत्रणात अडकुन तुमचा आवाज दाबून टाकू. भाजपने केलेल्या आंदोलनावेळी शहाराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे यांनी क्रांती चौकात नोटीशींची होळी केली होती.
प्रवीण देरकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! मुंबै जिल्हा बॅंक निवडणुक प्रकरणी गुन्हा दाखल
दरम्यान, राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा झाला असून त्यासंदर्भात केंद्रीय गृह सचिवाला मी माहिती दिली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवली. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने देखील घोटाळा झाल्याचा शिक्कामोर्तब केला आहे. मात्र या घोटाळ्याची चौकशी सरकार करू शकत नाही. जर हा घोटाळा काढला नसता, तर कोट्यवधी रूपयांचा घोटाळा दबुन गेला असता. असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Read also:
- ” दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीने नव्हे तर सडक्या बुद्धीने “; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर घणाघात
- मलिकांचा राजीनामा घ्या; नाही तर ठाकरे-पवार सरकारने सरकारी जावई घोषीत करा: राम सातपुते
- रुकावटे है ज़रूर पर हौसले ज़िंदा है! 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया व्हायरल
- बच्चू कडूंचं नाव निजामुद्दीन शेख तर पटोलेंचा अमजद खान; वळसे पाटलांनी केला घटनेचा उलगडा
- “घर का काॅंग्रेस नकोय, सब की काॅंग्रेस हवंय”; ज्येष्ठ काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य