मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सध्या वीजतोडणीचा मुद्दा चांगलाचं गाजला आहे. याचे पडसाद सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील बघायला मिळाले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. तसेच वीजकापणीच्या मुद्यावरून आरोप देखील एकमेकांवर केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.
मलिकांचा राजीनामा घ्या; नाही तर ठाकरे-पवार सरकारने सरकारी जावई घोषीत करा: राम सातपुते
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ऊर्जा मंत्रालयाला आम्ही कित्येकदा सांगतोय की, वीज तोडणीची कारवाई बंद करा आता, पण ऐकायलाच तयार नाही. कोल्हापुरात वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्याने थेट महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला खाली खेचणार आहे. देवेंद्र फडणवसी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची वीज कापण्याचा विचार कधीही केला नव्हता. मात्र महाविकास आघाडी सरकारने वीज तोडणीची मोहिम राबवली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात वीजवितरणाबाबत माहिती देताना म्हणाले की, आमच्या काळात 4 हजार 175 कोटींच्या नफ्यात असलेल्या विद्युत निर्मिती कंपन्या आज अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या आहेत. हा तोटा गरीब शेतकऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात येतो आहे. खरंतर शेतकऱ्यांकडून वसूली करण्याचा अधिकार महाविकास आघाडीला नाही. तरीही वीज तोडणीची मोहिम सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
बच्चू कडूंचं नाव निजामुद्दीन शेख तर पटोलेंचा अमजद खान; वळसे पाटलांनी केला घटनेचा उलगडा
अलिकडेच एका तरूण शेतकऱ्यांनी वीजकापणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तसेच कोल्हापूरात देखील वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्याने महावितरण कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वीजकापणीचा मुद्दा दिवेसंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार त्याबद्दल कोणती भूमिका घेणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- गावसकर, सचिन विराटसारखे दिग्गज संन्यास घेतात; मग काॅंग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का नाही?
- महाविकास आघाडी सरकार झुकती है! बस झुकानेवाला चाहिए
- ” दरेकरांनी त्यांचं नाव बदलून दरोडेखोर ठेवावं”; नाना पटोलेंची दरेकरांवर जहरी टीका
- भाजपला ते आंदोलन भोवलं; भाजपच्या आमदारासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- ” दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीने नव्हे तर सडक्या बुद्धीने “; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर घणाघात