मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभेत निवडणुकीत काॅंग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. या निवडणुकांवरून काॅंग्रेसच्या नेतृत्वाबाबत शंका उपस्थित केली जात असताना काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गांधी कुटुंबीयांनी अध्यक्ष सोडण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी घर की काॅंग्रेस ऐवजी सब की काॅंग्रेस झाली पाहिजे असंही म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काॅंग्रेसबद्दल वक्तव्य केले आहे.
महाविकास आघाडी सरकार झुकती है! बस झुकानेवाला चाहिए
विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या फरकाने हार पत्करावी लागल्याने काॅंग्रेसच्या जी-23 नेत्यांनी डोकं वर काढलं आहे. त्याबद्दल टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे आहेत. ते कुणाची तरी सुपारी घेऊन काॅंग्रेसविरोधात काम करत आहेत. असं म्हटलं आहे. तसेच ते कुणाची तरी सुपारी घेऊन काॅंग्रेसविरोधात काम करत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
” दरेकरांनी त्यांचं नाव बदलून दरोडेखोर ठेवावं”; नाना पटोलेंची दरेकरांवर जहरी टीका
तसेच काश्मिर फाईल्सवरून राज्यात चर्चावर त्यांनी मौन सोडलं. त्यावर ते म्हणाले की, महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांसाठी आम्ही करून दाखवलं. ज्या राज्यांत भाजपची सत्ता आहे त्या राज्याने काश्मिरी पंडितांच्या मुलासाठी काय केलं ? केवळ चित्रपट टॅक्स मोफत दिल्याने वेदना संपवता येणार नाहीत. 32 वर्षानंतर तुम्हाला आठवतंय. कारण पुढे चार राज्यांच्या निवडणुकां आहेत. आम्ही त्या पिढीला 32 वर्षापुर्वी दिलं आहे. उगाचच इतिहास तोडूनमोडून लोकांसमोर आणू नका. काश्मिरची लढाई ही देशाची लढाई होती. असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपला ते आंदोलन भोवलं; भाजपच्या आमदारासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
देशातील एव्हाना राज्यातील राजकारण सध्या विविध मुद्यांवरून पेटत आहे. काॅंग्रेसची अवस्था पाहता भाजपला टक्कर देणारा पक्ष सध्या लोकं शोध घेत आहेत. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता काॅंग्रेससोबत घेऊन प्रादेशिक पक्ष भाजपविरोधात उभे राहण्याची गरज असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काॅंग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे.
Read also:
- मराठीच्या मुद्द्यावरून मनसेचं पुन्हा ‘खळखट्याक’; आयपीएलसाठी परराज्यातून आणलेल्या सर्व बसेस फोडल्या
- अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार
- “एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी द्या! सरकार कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो”
- शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला खाली खेचणार; वीजकापणीवरून माजी ऊर्जामंत्र्याचं वक्तव्य
- गावसकर, सचिन विराटसारखे दिग्गज संन्यास घेतात; मग काॅंग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का नाही?