मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. यानंतर पुढची राजकीय भूमिका दोन दिवसांत मांडणार असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मात्र राज्यसभेची निवडणुकीसाठी येत्या १५ तारखेला शेवटची तारिख असल्याने अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी १२ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसमधून राजीनामा का दिला ? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले….
अशोक चव्हाण यांच्यासोबत आज भाजपच्या मुंबई येथील कार्यालयात माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी ही महत्वाची घडामोड घडली असून महाराष्ट्रात यामुळे कॉंग्रेसला मोठे खिंडार पडायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या २८ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमधली देखील राजकीय गणितं बदलली आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता भाजप आपला सहावा उमेदवार देखील देण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा कॉंग्रेस पक्षाला राम राम, नाना पटोलेंनी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, दरम्यान, शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात विविध खाती सांभाळल्यानंतर २००८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी शपथ घेतली होती. तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशोकपर्व नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज देऊन तो खर्च निवडणुक खर्चात दाखवल्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर आहे. तसेच कारगील युद्धातील विधवांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात नातेवाईकांना आणि आप्तस्वकियांना घरं दिल्याच्या प्रकरणात अशोक चव्हाण यांचं नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपदा सोडावं लागलं होतं.
त्याच आदर्श घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच्या एका सभेत केलं. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. याआधी देखील राज्यातील सिंचन घोटाळ्याचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी एका सभेत केले, मग अजित पवार यांनी राष्ट्रवादीला धक्का देत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला.
READ ALSO :
हेही वाचा…“माझी शेवटची शोभा यात्राही कॉंग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल”, कॉंग्रेसच्या या नेत्याने घेतला प्रण
“श्रेय वादाची लढाई नाही!”धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून कॉंग्रेस अन् भाजपमध्ये जुंपली
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा राजीनामा..! परंतु कॉंग्रेसने ‘या’ निवडणुकीत भाजपला पाणी पाजलं, एकच चर्चा
हेही वाचा…“भाजपाला आता कुत्रासुद्धा मत देणार नाही , कारण..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“आगे आगे देखो होता है क्या..” फडणवीसांच्या विधानानंतर भाजप नेत्यांची धाकधुक वाढली, कुणाचं तिकीट, तर कोणाची खरकटी…?