मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पुर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कॉंग्रेसला राम राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यातच आता केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेत अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळ्याचं उल्लेख करण्यात आल्याने चव्हाणांनी कॉंग्रेसला राम राम ठोकल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आणि आदर्श घोटाळा नेमका काय ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना प्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला होता. त्यामुळे त्यांना २०१० मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.
हेही वाचा…“माझी शेवटची शोभा यात्राही कॉंग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल”, कॉंग्रेसच्या या नेत्याने घेतला प्रण
आदर्श गृहनिर्माण संस्था ही भारतातील संरक्षण मंत्रालयातील युद्धातील विधवांच्या व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी मुंबईतील कुलाबा येथे बांधलेली एक ३१ मजली इमारत आहे. अनेक वर्षांच्या काळात राजकारणी, नोकरशहा, आणि लष्करी अधिकाऱ्यांनी कथितपणे जमीन, मालकी, परिसर व फर्श निर्देखशांकांसहित अनेक नियम उल्लंघने आणि या सहकारी सोसायटीमध्ये लष्काराशी संबंधित नसेलल्या खाली दिलेल्या सदस्यांना प्लॅट्स दिले.नोव्हेंबर २०१० मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे सोसायटीत तीन फ्लॅट्स असलेले तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
हेही वाचा…“श्रेय वादाची लढाई नाही!”धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून कॉंग्रेस अन् भाजपमध्ये जुंपली
तर २०११ मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परिक्षक च्या एका अहवालात असे म्हटले आहे की, आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रतकरणाची चौकशी करण्यासाठी निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक गट महत्वाच्या पदांवर बसलेला होता. त्यांनी चौकशीत हस्तक्षेप करण्यासाठी कायदे व नियम नष्ट केले असल्याचाही आरोप होत आहे. यातच पंतप्रधान सरकारी जमीन व एक सार्वजनिक मालमत्ता वैयक्तिक लाभांसाठी जानेवारी २०११ मध्ये महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन केला होता. या आयोगाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एन.एन. कुंभार हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते. दोन वर्षापुर्वी १९८२ साक्षीदारांना वगळ्यानंतर आयोगाने अंतिम अहवाल एप्रिल २०१३ मध्ये महाराष्ट्र सराकरला सादर केला होता. या अहवालात प्रॉक्सीदवारे तयार केलेल्या २२ खरेद्यांसहह २५ बेकायदेशीर वाटपांची सविस्तर माहिती होती.
READ ALSO :
हेही वाचा…बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! शरद पवार गटाचा चव्हाणांना टोला
भाजपकडून अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी ? भाजप चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत, रंगत वाढली
हेही वाचा…एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत, मोदी-शहांच्या ग्रीन सिग्नची प्रतिक्षा, एकच चर्चा
हेही वाचा…राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणुक, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण
हेही वाचा…ठरलं तर मग..! अशोक चव्हाणांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार, कॉंग्रेस खिंडार पडण्यास सुरूवात