मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या गौप्यस्फोटानं राजकारणात खळबळ उडाली आहे. माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे नेते व आव्हाडांमधील राजकीय हेवेदावे जगजाहीर आहेत. आता हा वाद अधिकच चिघळल्याचे आव्हाडांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी राहूद्या, राजकारणासाठी त्याचा बळी नको – मनसे
ठाणे महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महापालिकेच्या वॉर्डरचनेवरून राजकारण तापू लागले आहे. याबाबत आव्हाड यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह महापालिका आयुक्तांवर नाराजी व्यक्त करत हा आरोप केला आहे. आघाडी करण्याची आपली इच्छा आहे, पण तुमची इच्छा नसेल तर काय करणार असा सवाल करत आव्हाड म्हणाले, माझाच राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग मी बचावात्मक भूमिका घेणार की नाही.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट
आपल्या मतदारसंघातील जागा 23 वरून 18 वर आणल्याचे सांगत आव्हाड म्हणाले, कळव्याचा एक वॉर्ड बनवताना तो मुंब्रापर्यंत नेला. त्यासाठी कोणतं गणित लावलं हे कळालं नाही. पालकमंत्र्यांकडून असा प्लॅन केला जात नाही. आयुक्तांनी त्यांच्या मनानेच केले असावे. एकूण 24 जागांपैकी सात हिंदू जागा आहे. यातून मुस्लिम द्वेषाचा प्रकार असल्याचे दिसते, असा आरोप आव्हाड यांनी केला.
म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?
ठाण्यात आघाडी झाल्यास दोघांचाही फायदा आहे. पण सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही एवढा त्रास झाला नव्हता, अशी प्रतिक्रियाही आव्हाड यांनी दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोलताना आव्हाडांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ठाणे महापालिका निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले होते की, इतरांची इच्छा असेल तर सोबत राहू. कुणीही राजकीय मग्रुरी दाखवू नये. शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना समजावं”, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
Read also:
- ‘भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकरांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत’
- राज्यातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव; संजय राऊतांचे व्यंकय्या नायडूंना पत्र
- धनंजय महाडिक, पुत्र विश्वजीत महाडिक पुन्हा सक्रिय; आगामी काळात मोहोळ तालुक्यात एकहाती सत्तेसाठी उतरले मैदानात
- २०२४ला औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेच होणार; रावसाहेब दानवेंना धक्का देत सत्तरांची सोयगावात जोरदार बॅटिंग
- पुण्यात प्रभावरचनेवरून राष्ट्रवादीत चलबिचल; प्रमुखांनी आमचा विचारच केला नसल्याची दबक्या आवाजात चर्चा