मुंबई : शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांवर दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विलंब लावत असल्याचा ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आला आहे. कोर्टाने फटकारल्यानंतरही या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांवर हल्लाबोल केला आहे. त्यावर अनेकांकडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकत असल्याचा आरोप नार्वेकरांनी ठाकरे गटावर केला आहे.
हेही वाचा…फ्लेक्सबाजी करून शहराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी पुनीत बालन यांना दणका, तातडीने ३ कोटी २० लाख भरण्याचे आदेश
महाराष्ट्राच्या विधानसभेत टाईमपास एक टाईमपास दोन टाईमपास तीन अशी वेबसिरीज सुरू आहे. या वेबसीरिजचे लेखक राहुल नार्वेकर असून त्यांना किती मोठी बेवसीरीज करायची आहे. त्यांना करू द्या. परंतु सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. यावर अनेक लोकांकडून अनेक माध्यमांतून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभावर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप नार्वेकरांनी ठाकरे गटावर केला आहे.
हेही वाचा…“एक नाराज इंजिन फडणवीसांना जाऊन भेटलंय”,नाराजीच्या चर्चांवर सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
शिवसेनेच्या अपात्र आमदारांसंदर्भात निर्णय संविधानातील नियमानुसार, कायद्यानुसारच घेणार आहे. कुणी कितीही प्रभाव करण्याचा प्रयत्न केला. कुणी कोणत्याही प्रकारचे आरोप केलेत. परंतु त्यातून प्रभावित होणार नाही. असंही राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे. अलिकडेच शिवसेनेचे युवा नेते यांनी राहुल नार्वेकरांच्या घाना देशाच्या दौऱ्यावरून सवाल केले होते. त्यानंतर नार्वेकरांनी घाना देशाचा दौराच रद्द करावा लागला होता. त्यावर ते बोलत होते.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुकानंतरच होणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर
हेही वाचा…लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, अन् काॅंग्रेस आणि भाजपमध्ये भांडण, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…टॉयलेट साफ करायला लावणं महागात पडलं, शिंदेंच्या ‘या’ खासदारवर गुन्हा दाखल
हेही वाचा…अजून किती तारखा…? शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी आणखी लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
हेही वाचा…अजित पवारांची नाराजी, भाजपचा अजित दादांना पाठिंबा, पण शिंदेंची आडकाठी, दिल्लीत काय झालं ?