मुंबई : प्रभाग रचनेत केलेले बदल आणि ओबीसी आरक्षण यामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, परंतु आता ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी आता २८ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. २२ ऑगस्टपासून ही सुनावणी कारणाविना लांबणीवर जात आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“एक नाराज इंजिन फडणवीसांना जाऊन भेटलंय”,नाराजीच्या चर्चांवर सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टात सुनावणी होणार होती, पंरतू ती सुनावणी झाली नाही. आता पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे. २२ ऑगस्टपासून ही सुनावणी कारणाविना लांबणीवर जात आहे. यामुळे मुंबई, पुण्यासह अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या याचिका खोळंबल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी आता २०२४ उजाण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…अजित पवार नाराज आहेत का ? शिंदे-फडणवीस तात्काळ दिल्लीला रवाना
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गेल्या दीड वर्षात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर एकदाही सुनावणी झाली नाही. आताही सुनावणी होण्यापूर्वीच ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दिवाळीनंतर सुनावणी राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यात मुंबई, ठाणे, कल्याणे-डोंबिवली, पुणे नाशिक महापालिकांसह अनेक जिल्हा परिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा यामध्ये समावेश आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, अन् काॅंग्रेस आणि भाजपमध्ये भांडण, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…टॉयलेट साफ करायला लावणं महागात पडलं, शिंदेंच्या ‘या’ खासदारवर गुन्हा दाखल
हेही वाचा…अजून किती तारखा…? शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी आणखी लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
हेही वाचा…अजित पवारांची नाराजी, भाजपचा अजित दादांना पाठिंबा, पण शिंदेंची आडकाठी, दिल्लीत काय झालं ?
हेही वाचा…फ्लेक्सबाजी करून शहराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी पुनीत बालन यांना दणका, तातडीने ३ कोटी २० लाख भरण्याचे आदेश