मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यानंतर चर्चेंना पुन्हा उधाण आलं. यातच अजित पवारांची तब्येत बरी नसल्याचं कारण यावेळी सांगण्यात आलं. परंतु पालकमंत्री पदावरून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दुसऱ्या बाजूला रंगू लागल्या आहे.
हेही वाचा…४-१-१ महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरला, मुंबईतील लोकसभेच्या ‘या’ मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही
पुण्यासोबत नाशिक, कोल्हापूर, बीड, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे, यासाठी अजित पवार आग्रही असल्याचं बोललं जात आहे. परंतु यातली कुठलीच मागणी मान्य होत नाही म्हणून अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. दबावाच्या राजकारणाचा हा एक भाग असू शकतो, असे शिंदे गटाला वाटते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनाही मंत्रिमंडळाचा विस्तार हवा आहे. पण भाजपच्या श्रेष्ठींकडून विस्ताराला मान्यता मिळत नसल्याने अडचणी झालीय.
हेही वाचा…“सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत, पण औषधं घ्यायला पैसे नाहीत”, सुळेंचा हल्लाबोल
दरम्यान, मंत्रिमंडळाचा तिढा सोडवण्यासाठीच शिंदे आणि फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच पुण्याचे पालकमंत्रीपद भाजप सोडायला कदाचित तयार होईल. मात्र, शिंदे गटाकडून सातारा व रायगडचे पालकमंत्रीपद सोडले जामार नाही, असे सांगण्यात येत आहे. तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतूनच निर्णय होतील. सोबतच अर्थमंत्री म्हणून अजित पवारांना हवी तशी मोकळीक मिळत नसल्याचीही चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…फ्लेक्सबाजी करून शहराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी पुनीत बालन यांना दणका, तातडीने ३ कोटी २० लाख भरण्याचे आदेश
हेही वाचा…“एक नाराज इंजिन फडणवीसांना जाऊन भेटलंय”,नाराजीच्या चर्चांवर सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…अजित पवार नाराज आहेत का ? शिंदे-फडणवीस तात्काळ दिल्लीला रवाना
हेही वाचा…“दोन्ही पक्षांना समजून घेऊ, भाजपला त्याग करावा लागेल”, फडणवीसांचा भाजपच्या कार्यकर्त्यांना मोलाचा संदेश
हेही वाचा…फडणवीसांचा रोहित पाटलांना थेट फोन, फडणवीसांनी दिलं आश्वासन, म्हणाले, “एक महिन्याच्या आत.., “