पारनेर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या एका आडिओ क्लिपने सध्या अहमदनगर जिल्हा आणि राज्यात खळबळ उडवून दिली असून, पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी यात दिला आहे. यामध्ये त्यांनी थेट कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या बोलण्यातून रोख हा स्थानिक आमदार निलेश लंकेकडे असल्याचे दिसून येत आहे.
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर वाशिममध्ये दगडफेक; शिवसैनिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
तसेच, आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं असून, ते वाचून दाखवतानाच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी, महिला म्हणून प्रशासनात कसा छळ केला जातो. लोकप्रतिनिधी काय प्रकारचा त्रास देतात आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात, याचा गौप्यस्फोट केला आहे. लसीकरणावरुन आमदार लंकेंनी आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, त्या घटनेचा उल्लेखही देवरे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसेनेच्या कृतीची फडणवीसांनी केली तालिबानशी तुलना, म्हणाले…
आपल्याविरुद्ध दमदाटी करणे, मारहाण केल्याची खोटी तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून जबरदस्तीने लिहून घेणे, ऍट्रोसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी देणे, आपल्याविरुद्ध विधीमंडळात प्रश्न मांडणे असे अनेक प्रकार घडल्याचे त्यांनी क्लिपमध्ये सांगितलं असून, मुलांकडे पाहून आत्महत्या करण्याचा विचार दूर निघून जातो. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे पाऊल उचलावे लागत आहे, असं त्यानी म्हटलं आहे.
ऑडिओ किल्पमध्ये काय आहे?
प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सूसाईट नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावलं होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा मी पण तेच पालूपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आताा त्राण राहिले नाही.
तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांचे हुजरी करत तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी थूंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.
Read Also :
- माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते”- गडकरी
- मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्रानं घ्यावी, पण अशोक चव्हाण कुठे आहेत? संभाजीराजे आक्रमक
- “पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही”, मोदी मंदिरावरून उपमुख्यमंत्र्यांचा शाब्दिक टोला
- ‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा!’ राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीची टीका
- “माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची राणेंना टोलेबाजी