दिल्ली : न्यूज नेशन वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बुधवारी बोलताना, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी, “माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी, हे भारताच्या लोकशाहीचे दोन आदर्श नेते होते. अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे, तर नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीत मोठे योगदान आहे,” असे वक्तव्य केले आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्रानं घ्यावी, पण अशोक चव्हाण कुठे आहेत? संभाजीराजे आक्रमक
यावेळी त्यांनी, “सत्तेतील आणि विरोधी पक्षातील सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण करावे. मी देखील पक्षाचा अध्यक्ष राहिलो आहे. आजचा विरोधी पक्ष, उद्याचा सत्ताधारी पक्ष आहे, तर उद्या सत्तेत असलेला पक्ष नंतरचा विरोधी पक्ष आहे. या आमच्या भूमिका बदलत राहतात. मी आयुष्यात इतकी वर्षे विरोधक म्हणून काम केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी आदराने वागले पाहिजे. संसदेतल्या व्यत्ययामुळे दुखः झाले,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही”, मोदी मंदिरावरून उपमुख्यमंत्र्यांचा शाब्दिक टोला
तसेच, “सत्ताधारी आणि विरोधक अशी लोकशाहीची दोन चाके आहेत. लोकशाही यशस्वी करण्यासाठी तितकाच सशक्त विरोधी पक्षही आवश्यक आहे. म्हणून काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून मजबूत झाला पाहिजे आणि विचारधारेच्या आधारावर त्यांनी जबाबदार विरोधकाचे काम केले पाहिजे, अशी माझी सदिच्छा आहे.” असं विधान त्यांनी केलं.