मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा ‘जन आशीर्वाद’ यात्रेला आज मुंबईतून सुरुवात झाली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर, ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. यावेळी, त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीला वंदन केलं. शिवसेनेकडून राणेंना स्मृतीस्थळाकडे जाऊ देणार नाही, त्यांना तिथून हाकलून लावू, असा इशारा दिल्यानंतर राणे याठिकाणी येणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, हि भेट सुरळीत पार पडली.
मुंबई महापालिकेत ‘आम्हीच’ येणार! सेनेच्या होमग्राऊंडवरून राणेंचा हल्लाबोल
यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, “मी बाळासाहेबांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालो. सांगितलं साहेब तुम्ही आज हवे होते. मला जे काही मिळालं, ते त्यांच्यामुळेच. मला त्यांनी घडवलंय. आज बाळासाहेब असते, तर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता आणि अशीच प्रगती कर, असा आशीर्वाद दिला असता. आज त्यांचा हात डोक्यावर नसला, तरी त्यांचे आशीर्वाद नककीच माझ्यासोबत आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला…”, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल
तसेच, “कुणाही दैवताचं स्मारक असो, तिथे विरोधाची भाषा करू नये, समोरच्याच्या भावनांचा विचार करावा आणि मग वक्तव्य करावं, इथे येण्यासपासून कुणी कुणाला रोखण्याचा प्रकार करू शकत नाही. बाळासाहेब काही कुणाची खासगी मालमत्ता नव्हते, ते संपूर्ण राज्याचे आणि देशाचे नेते होते. प्रत्येकालाच त्यांच्याबद्दल खूप आदर आणि अभिमान आहे,” असा टोला त्यांनी शिवसेना नेत्यांना लगावला.
२०१५ च्या निवडणुकीत अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंतकडून नारायण राणेंचे जंगी स्वागत
दरम्यान, राणे-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, मुंबईमधल्या भाजपच्या या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले असून, राणे यांची यात्रा या तरीही पार पडते आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्या यात्रेला नोटीस पाठवली आहे.
Read Also :
- आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार; जन आशीर्वाद यात्रेत राणेंचा एल्गार
- आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
- …अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात
- भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेने राज्याला ‘हा’ धोका! संजय राऊत यांनी दिला इशारा