मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मंत्री आणि खासदार असलेले डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील, यांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशीर्वाद’ यात्रेला १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे, तर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं स. ११ च्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन झालं.
“उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला…”, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल
यावेळी, मातोश्रीच्या बाजूलाच लागून असेल्याला एका ठिकाणावरून यात्रेतील पाहिलं भाषण करतेवेळी त्यांनी, “मी जिथं उभा आहे, तिथून जवळच कलानगर आहे. त्यांच्याही कानावर काही गोष्टी जायला पाहिजेत. येणाऱ्या महापालिकेत गेल्या २ वर्षात तुम्ही जनतेला कसं बनवलं, याचा उद्धार होणारच आहे. पण, जनता तुमच्या कारभाराला कंटाळली असून, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही,” असा घणाघात केला.
२०१५ च्या निवडणुकीत अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंतकडून नारायण राणेंचे जंगी स्वागत
तसेच, “मुंबईची महापालिका भाजपला जिंकवून देण्यासाठीच मी आलो आहे, महापालिकेवर आमचीच सत्ता असणार. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे,” असा हल्लाबोल त्यांनी, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. त्यामुळे, आता मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार; जन आशीर्वाद यात्रेत राणेंचा एल्गार
“राज्यातील जनता महाविकास आघडी सरकारला कंटाळली असून, या सरकारकडून राज्याचा कोणताही विकास होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत,” अशी जोरदार टीका त्यांनी महाविकास आघाडीवर आणि मुख्यमंत्र्यांवर केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे, तृप्ती सावंत उपस्थित होत्या.
Read Also :
- अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
- …अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात
- आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- पिंपरी चिंचवडमधील स्थायीच्या अध्यक्षांना अडकवण्याचे सुनियोजित षडयंत्र; शहानिशा करण्यासाठी आमदार माधुरी मिसाळांची नियुक्ती
- “राज्यातून ४० मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही!”, उदय सामंतांचा भाजपवर हल्लाबोल