मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मंत्री आणि खासदार असलेले डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील, यांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशीर्वाद’ यात्रेला १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे, तर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं स. ११ च्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन झालं.
“मूर्ख आहात काय? कसल्या अंगार-भंगार घोषणा देतायत, हे शोभतं का?”, पंकजा मुंडेंचा रुद्रावतार
यावेळी नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “राज्यातील जनता महाविकास आघडी सरकारला कंटाळली असून, या सरकारकडून राज्याचा कोणताही विकास होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत,” असा हल्लाबोल त्यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.
“उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, म्हणून जनता आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपाची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळेच यात्रेला मोठया प्रमाणावर उपस्थिती दिसत आहे”, असं म्हणत त्यांनी, “पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने, मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. त्यामुळे मी त्यांचा आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचाही ऋणी आहे. त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली.”
“बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या घरफोड्या शिवसैनिकाला स्मृतीस्थळाची भेट घेऊ देणार नाही!”
दरम्यान, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी, यात्रेची सुरुवात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून केली. त्यानंतर आता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, “मुंबईची महापालिका भाजपला जिंकवून देण्यासाठीच मी आलो आहे, महापालिकेवर आमचीच सत्ता असणार,” असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे. त्यामुळे, आता मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Read Also :
- आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
- …अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात
- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड; पाच जण ताब्यात
- डॉ. स्वप्नील शिंदेंची आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, शासनाचे चौकशीचे आदेश