बीड : भाजपने राज्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील या चारही नेत्यांना घेऊन ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेचा पहिल्या दिवशी, अर्थराज्यमंत्री कराड यांनी पंकजा मुंडे यांची घरी जाऊन भेट घेतली. तेव्हा, मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, नंतर गोपीनाथ गडावरही समर्थकांनी जोरदार राडा घातला. त्यामुळे, मुंडे यांनी समर्थकांना चांगलेच सुनावले.
भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात, मंत्री भागवत कराडांसमोर मुंडे समर्थकांचा गोंधळ
“मी शिकवलं आहे का तुम्हाला असं वागायला? मूर्ख कुठले? तुमच्यावर असे संस्कार आहेत? ‘मुंडे साहेब अमर रहे’च्या घोषणा आम्ही रोखू शकत नाही. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. पण अंगार-भंगार घोषणा काय देताय? इथे दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे? मला हे वागणं शोभत नाही. जेवढ्या उंचीची मी आहे, तेवढी स्वतःची लायकी ठेवा, नाहीतर मला भेटायला येऊ नका,” अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं आणि संपातून गाडीच्या दिशेने निघून गेल्या.
‘औरंगाबाद’चे नामकरण लवकरच ‘संभाजीनगर’ होणार? शिवसेना नेत्याचे मोठे विधान
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न देता, भागवत कराड यांची मंत्रीपदावर वर्णी लागल्याने, मुंडे समर्थक नाराज होतेच. मात्र अजूनही त्यांच्यात रोष असल्याचा प्रत्यय आजच्या प्रकारामुळे पुन्हा आला. आज सकाळी साडे नऊच्या सुमारास कराड, मुंडे यांच्या घरी पोहोचले असता, ‘पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है, अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे,’ च्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन हर्षवर्धन पाटलांची कन्या, राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला
दरम्यान, राज्यात भाजपकडून येत्या १६ ऑगस्टपासून, राज्याच्या वेगवेगळया भागात ही यात्रा काढण्यात येणार असून, याद्वारे चारही नेते जनतेशी संवाद साधणार आहेत. कपिल पाटील यांची यात्रा १६-२० ऑगस्ट, भारती पवार १६-२० ऑगस्ट, डॉ. भागवत कराड १६-२१ ऑगस्ट, तर नारायण राणे यांची यात्रा १९-२५ ऑगस्ट या काळात निघणार आहे. त्यामुळे, राज्यातील महाविकास आघाडीला शह देण्यासाठीच भाजपने हा निर्णय घेतल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Read Also :
- शिवसेना खासदार गवळींच्या कार्यालयात तब्ब्ल ७ कोटी आले कुठून? भाजपचा सवाल
- “मुख्यमंत्री मरू द्या”, वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा अखेर माफीनामा
- ताकद पहायची असेल तर दत्तात्रय भरणेंनी उजनी धरण ओलांडून दाखवाव – शिवसेनेने दिला दम
- “मुख्यमंत्री मरू द्या”, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली
- बाबासाहेबांनाही कधी वाटलं नसेल, भविष्यात असे राज्यपाल येतील म्हणून; हसन मुश्रीफांचा कोश्यारींवर घणाघात