बीड : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यातून भाजपच्या चार नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर, भाजपने आता राज्यात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील या चारही नेत्यांना घेऊन, भाजप ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरू करणार असून, त्या माध्यमातून भाजप संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे.
महाविकास आघाडीला शह देण्यासाठी ‘बिग ४’ तयार, १६ ऑगस्टपासून भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’
या यात्रेची आजपासून सुरुवात झाली. यावेळी, केंद्रीय मंत्री भागवत कराड हे गोपीनाथ गडावर दाखल झाले असता, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यादेखील उपस्थित होत्या. त्याचवेळी मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी समर्थकांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. मात्र तरीही मुंडे समर्थकांनी आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या. शेवटी प्रचंड गोंधळात पंकजा मुंडेंनी ‘जन आशीर्वाद’ यात्रेला झेंडा दाखवला आणि यात्रेला सुरुवात झाली.
वैजनाथ मंदिर, परळी येथे भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या समावेत उपस्थित राहुन दर्शन घेतले. व आरती संपन्न झाली याप्रसंगी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.#drkaradupdates#JanAshirwadYatra pic.twitter.com/I9ju1yXdK5
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) August 16, 2021
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरु झाली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्ली गाठून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. यांनतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी, समर्थकांना राजीनामा मागे घेण्याचं आवाहन केलं. तेव्हपासून नाराज मुंडे समर्थक, तसेच बंजारा समाजाने पंकजा मुंडे यांनी पक्षबदल करावा, ही मागणी लावून धरली आहे. नुकत्याच राज्य भाजप नेत्यांच्या दिल्ली’वारी’तही पंकजा मुंडे, राज्य भाजप नेत्यांपासून लांब बसल्या होत्या.
दुसरीकडे, भाजपच्या या रणनीतीमुळे, राज्यातील महाविकास आघाडीला शह देण्यासाठीच भाजपने हा निर्णय घेतल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजप पक्ष बळकटीकरणावर जोर देणार असून, एकीकडॆ संघटन बांधणी तर दुसरीकडे जनतेशी संवाद, अशाप्रकारे ‘एकाच दगडात दोन हेतू’ भाजप या माध्यमातून साधणार आहे. त्यामुळे, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घडत असल्याने त्याचा परिणाम काय होईल, हे येत्या काळात दिसेलच!
- “पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो”- महादेव जानकर
- ‘औरंगाबाद’चे नामकरण लवकरच ‘संभाजीनगर’ होणार? शिवसेना नेत्याचे मोठे विधान
- विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन हर्षवर्धन पाटलांची कन्या, राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला
- शिवसेना खासदार गवळींच्या कार्यालयात तब्ब्ल ७ कोटी आले कुठून? भाजपचा सवाल
- पंकजांसोबत आजही बहिणीसारखं नातं; फडणवीसांच्या विधानावर, पंकजा मुंडे म्हणतात…