बीड : भाजपने राज्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील या चारही नेत्यांना घेऊन ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेचा पहिल्या दिवशी, भारती पवार पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी हुतात्मा स्तंभ या ठिकाणी, हुतात्म्यांना अभिवादन करत आपल्या दौऱ्याची सुरुवात केली.
शिवसेना खासदार गवळींच्या कार्यालयात तब्ब्ल ७ कोटी आले कुठून? भाजपचा सवाल
यावेळी, पालघरमध्ये प्रशासकीय यंत्रणांचा नियोजनशून्य कारभार पाहायला मिळाला. त्यावरून, “माझ्या दौऱ्याची राज्य सरकारने धास्ती घेतली की काय?” अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली. तसेच, पालघरच्या शासकीय विश्रामगृहात अनेक असुविधांचा सामना करावा लागल्यामुळे त्यांनी, “माझ्या दौऱ्यात राज्य शासनाने आकस ठेवून मला सुविधा पुरविली नाही,” असा आरोपही केला.
विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन हर्षवर्धन पाटलांची कन्या, राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला
“माझ्या दौऱ्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मला भेटणे अपेक्षित होते. जिल्ह्याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र तसे त्यांनी केले नाही. त्यांनी राज्य सरकारच्या दबावाखाली येऊन, माझी भेट व आमचा दौरा टाळला. त्यांनी किमान जिल्ह्याची माहिती दिली असती, तर जिल्ह्याच्या विकासासाठी मला प्रयत्न करता आले असते. योग्य प्रकारे आढावा घेता आला असता. मात्र महितीअभावी ते शक्य होत नाहीये,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.