वाशीम : भाजप नेते किरिट सोमय्या यांनी शिवसेनेच्या वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर, त्यांनीच पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एका तक्रारीवरुन सवाल उपस्थित करत भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यावर आता गवळी यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर दिले असून, “सोमय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, त्यांनी माझ्या समोर येऊन बसून सांगावे कोणता भ्रष्टचार झाला, कशामध्ये झाला? तेव्हा त्यांना मी उत्तरे देईन,” असे आव्हान त्यांनी दिले आहे.
शिवसेना खासदार गवळींच्या कार्यालयात तब्ब्ल ७ कोटी आले कुठून? भाजपचा सवाल
किरिट सोमय्या यांनी ट्वीट करत, गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ”वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा नितीन गडकरीजींच्या पत्राद्वारे उघड झाला आहे. वाशिम शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या रु.100 कोटींच्या घोटाळ्या विरोधात न्यालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणात अधिक चौकशी करण्यासाठी मी शुक्रवार 20 ऑगस्टला वाशिम येथे भेट देणार आहे.” असे त्यांनी म्हटले होते.
वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा नितीन गडकरीजींच्या पत्राद्वारे उघड झाला आहे
वाशिम शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या रु.100 कोटींच्या घोटाळ्या विरोधात न्यालयात जनहित याचिका दाखल झाली आहे
या प्रकरणात अधिक चौकशी करण्यासाठी मी शुक्रवार 20 ऑगस्टला वाशिम येथे भेट देणार आहे pic.twitter.com/pFFbmEFRoN
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 14, 2021
“मूर्ख आहात काय? कसल्या अंगार-भंगार घोषणा देतायत, हे शोभतं का?”, पंकजा मुंडेंचा रुद्रावतार
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी, ”खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे 5 वाजता ₹7 कोटी रोख नगदी चोरी? शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7/7/2019 रोजी सकाळी 5 वाजता ₹7 कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलिस ठाण्यात केली आहे. एवढी रोख रक्कम आली कुठून?”, असा सवाल उपस्थित केला होता.
खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे 5 वाजता ₹7 कोटी रोख नगदी चोरी?
शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7/7/2019 रोजी सकाळी 5 वाजता ₹7 कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली
एवढी रोख रक्कम आली कुठून? pic.twitter.com/0nBngqhWrx
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 16, 2021
भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात, मंत्री भागवत कराडांसमोर मुंडे समर्थकांचा गोंधळ
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं असून, शिवसेनेच्या नियमबाह्य कामांमुळे आणि दहशतीमुळे, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद पडतील. स्थानिक नेत्यांचे असेच प्रकार सुरु राहिले, तर राज्यात रस्त्यांच्या कामांना नवीन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल,” असा थेट इशारा दिला होता. या पत्रात त्यांनी वाशीम जिल्ह्याचा विशेषत्त्वाने उल्लेख केला होता. या पार्शवभूमीवर, हा प्रकार उघडकीस आला असल्याने संशयाचे वातावरण तयार झाले आहे.
Read Also :
- ‘औरंगाबाद’चे नामकरण लवकरच ‘संभाजीनगर’ होणार? शिवसेना नेत्याचे मोठे विधान
- विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन हर्षवर्धन पाटलांची कन्या, राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला
- लायकीत राहा! नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करून टाकू, मनसेचा प्रवीण गायकवाडांना इशारा
- “मुख्यमंत्री मरू द्या”, वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा अखेर माफीनामा
- ताकद पहायची असेल तर दत्तात्रय भरणेंनी उजनी धरण ओलांडून दाखवाव – शिवसेनेने दिला दम