मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, “राज्यात जातीयवाद पहिल्यापासून होता. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. या मुद्द्यावरून निवडणुका लढल्या जातात आणि मतदानही होतं. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं, हे याआधी महाराष्ट्रात घडत नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद वाढीस लागला,” असे मोठे विधान केले होते.
“मूर्ख आहात काय? कसल्या अंगार-भंगार घोषणा देतायत, हे शोभतं का?”, पंकजा मुंडेंचा रुद्रावतार
त्यांच्या या विधानावर मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी, “राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. त्यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही, अशी बोचरी टीका केली होती.
भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात, मंत्री भागवत कराडांसमोर मुंडे समर्थकांचा गोंधळ
दरम्यान, त्यांच्या या टीकेला आता, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी देखील फेसबुक पोस्ट लिहित जोरदार प्रत्युत्तर दिले असून, ”२०१९ च्या लोकसभेला पुण्यातून इच्छुक असणारे प्रवीण गायकवाड, मी स्वतः पाहिलाय तुम्हला गल्लो गल्ली फिरत सांगत होते, की मी प्रवीण गायकवाड, मी प्रवीण गायकवाड. तुम्हला राज ठाकरे काय कळणार, लायकीत राहायचे नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू.” अशा शब्दात इशाराच दिला आहे.
‘औरंगाबाद’चे नामकरण लवकरच ‘संभाजीनगर’ होणार? शिवसेना नेत्याचे मोठे विधान
दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही त्यांच्यावर निशाणा साधताना नवाब मलिक यांनी, ”देशातल्या वर्णव्यवस्थेला हजारो वर्षांची परंपरा आहे. राज ठाकरे यांनी त्यांचं वाचन वाढवायला हवं,” असा टोला लगावत, “राष्ट्रवादी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. मात्र, राज ठाकरेंना हे माहीत नसावे किंवा त्यांचा जातीव्यवस्थेचा अभ्यास नसावा, म्हणून अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले,” असा हल्लाबोल केला आहे.
Read Also :
- विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन हर्षवर्धन पाटलांची कन्या, राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला
- शिवसेना खासदार गवळींच्या कार्यालयात तब्ब्ल ७ कोटी आले कुठून? भाजपचा सवाल
- “मुख्यमंत्री मरू द्या”, वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा अखेर माफीनामा
- ताकद पहायची असेल तर दत्तात्रय भरणेंनी उजनी धरण ओलांडून दाखवाव – शिवसेनेने दिला दम
- “मुख्यमंत्री मरू द्या”, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली