जालना : गेल्या सात दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भेट घेतली. त्याआधी राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफ्या तीन तरूणांनी वेळा अडवण्यात आला. त्यानंतर उपोषण करत असलेल्या ठिकाणी राज ठाकरे पोहचून जरांगे पाटलांशी त्यांनी वीस मिनिटे संवाद साधला. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून यातून काही मार्ग काढला जाईल का? यासाठी प्रयत्न करेन. असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.
हेही वाचा…“आतापर्यंत जातीसाठी माती खाल्ली, आता रयतेसाठी लढा”, वंचितने आरक्षणाचा फॉर्म्यूला मांडला
आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकारणी फक्त तुमची मत मागतात. तुमच्या प्रश्नांची यांना काहीही घेणदेण नाही. यामध्ये पोलिसांची काहीही चुकी नाही, त्यांनी फक्त आदेश पाळलेत. ज्यांनी लाठीहल्ला करण्याचे आदेश दिलेत, त्यांना मराठवाड्यात बंदी घाला. आरक्षण आणि पुतळ्याचे राजकारण करून तुमची मत फक्त घेतात, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा..,”उदयन राजे यांनी दिला सरकारला कडक इशारा
दरम्यान, आंतरवाली सराटी गावात आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज जालना शहरात बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, सातारा, बारामती, तसेच खेड, दर्यापूर, बार्शीतही आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मागील दोन दिवस विविध शहरात आंदोलने, मोर्चे काढण्यात येत आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्था देखील ठप्प झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ?” विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल
हेही वाचा…“महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे- भाजप सरकार..,! अजून किती अन्याय करणार महाराष्ट्रावर?”
हेही वाचा…“दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड, मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं
हेही वाचा…“हिंसक वळण देऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरूय,” अशोक चव्हाणांचा रोख नेमका कुणाकडे ?