नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काही ठिकाणी विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. तर काही ठिकाणी विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास टाकला आहे. काही नवख्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सूरूवात केली आहे. मात्र काही ठिकाणी विद्यमान खासदार असूनही साखर झोपेत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भारती पवारांनी अद्यापही प्रचाराला सुरूवात केलेली दिसून येत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“मला लोकसभा निवडणुक लढवायचीच नव्हती, पण…”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं विधान
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या भारती पवारांनी पहिल्यांदाच भाजपने तिकीट दिले अन् त्या निवडून आल्या. मात्र भाजप यावरच थांबले नाही तर भारती पवारांना केंद्रीय राज्य मंत्रीही दिलं. असे असतांनाही भारती पवारांनी आपल्या मतदारसंघात कोणतंही काम केले नसल्याचे दिसून येत आहे. यातच पक्ष संघटना बळकट करण्यासाठीही भारती पवार मागे पडल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवारांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, असा काहीसा कार्यकर्त्यांचा सुर होता. मात्र कोणताही कार्यकर्ता पुढे येऊन बोलू शकला नाही. यातच उमेदवारी दिली तरीदेखील पवार यांनी आपल्या प्रचाराला अद्यापही सुरूवात केल्याचं दिसून येत नाही. तर दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार आहे.
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात दाखल
भारती पवारांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण नाराज असल्याचे दिसून आले. याच दरम्यान हरिचंद्र चव्हाण यांनी शरद पवार यांची उमेदवारीसाठी भेट घेतली. हरिचंद्र चव्हाण यांनी दिंडोरी लोकसभेत तब्बल ३ वेळा प्रतिनिधित्व केलं आहे.त्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी आहे. असेअसतानाचीही भारती पवार यांनी कोणतीही भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही.
दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासह मॉर्क्सवादी कम्यनिस्ट पार्टीही मोठी ताकद राहिली आहे. राष्ट्रवादीकडून चिंतामण गावित, भगरे लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. यातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी दिली तरी भारती पवार यांचा पराभव याठिकाणी निश्चित मानला जात असल्याची चर्चा मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तेच तेच चेहरे किती वेळा देणार”, ? धंगेकरांच्या उमेदवारीनंतर कॉंग्रेसमधील नाराजी उघड
हेही वाचा…आढळराव पाटील आज हाती घड्याळ बांधणार ; अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश ?
हेही वाचा…विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ
हेही वाचा..धंगेकरांचा राहुल गांधींवर विश्वास नाही का ? रवींद्र धंगेकरांच्या पोस्टवर गिरीश बापटांचा फोटो
हेही वाचा..“रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू”, नणंदने भावजयाच्या विरोधात रणशिंग फुंकलं