यवतमाळ : पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा आणि नेर येथे शिवसेनाचा पक्ष प्रवेस कार्यक्रम गुरूवारी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री संजय राठोड हजर होते. मात्र यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी मात्र दोन्ही कार्यक्रमात दिसल्या नाहीत. याची राजकारणात चांगलीच चर्चा झाली.
हेही वाचा…“जो काकाचा, बहिणींचा, काकींचा झाला नाही, तो काय होणार महाराष्ट्राचा ? आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं
शिवसेना पक्ष फुट झाल्यानंतर भावना गवळींना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावलेत, आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार असं म्हणत विरोधकांनी भावना गवळींवर जोरदार टिका केली. त्याचबरोबर मध्यंतरी भावना गवळींचं आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट कापणार अशी चर्चा देखील सुरू होती. यातच आता सार्वजनिक कार्यक्रमातून देखील भावना गवळी यांना वगळण्यात येत असल्याची राजकारणाच्या एका कोपऱ्यात चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्यात एका दगडात दोन लक्ष्य साधले, मोहोळांना संधी तर मुळीक अन् देवधरांना धक्का
यातच दोन्ही कार्यक्रमात नेत्यांच्या भाषणात भावना गवळींचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. परंतु यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी केलेल्या विकासकामांचे जोरदार कौतुक झाले. त्यामुळे खासदार भावना गवळी यांच्या अनुपस्थितीची चर्चा होत आहे. दरम्यान खासदार गवळी या गुरूवारी यवतमाळ येथील त्यांच्या कार्यालयातच बसून होत्या. अशी माहिती आहे.
याबाबत भावना गवळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मी पाच वेळा खासदार राहिले आहे. पण पक्षाचा माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होत असताना मला बोलविण्यात आले नाही. जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार ? असेही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
“माढा लोकसभा मतदारसंघ मला चांगलाच ठाऊक,” माढा मतदारसंघावर शरद पवारांनी ठोकला मोठा दावा
हेही वाचा…पक्ष गेलं, चिन्हं गेलं, शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर, म्हणाले….
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ईडीची चौकशी लावा,” पन्नास खोकेंचा आरोपावरून रामदास कदम संतापले
हेही वाचा…“भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा ?” निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ
हेही वाचा…लेकांचं दमदार भाषण ऐकून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…