कोल्हापुर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता राजकीय मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. यातच कालपासून कोल्हापुर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मेळावा होत आहे. काल शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी व्हावी, अशी मागणी देखील यावेळी रामदास कदम यांनी केली आहे.
हेही वाचा…“भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले “
शिवसेना पक्ष फुटीनंतर गद्दार अन् पन्नास खोके एकदम ओके अस म्हणत ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावरून काल रामदास कदम यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. शिंदे गटाने पन्नास खोके घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केल्या मी मातोश्रीवर भांडी घासायला येणार. तसेच आरोप सिद्ध केले नाही तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी भांडी घासायला यावे, असं रामदास कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…धनगर समाजाला कोर्टाचा मोठा धक्का, ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी फेटाळली
पन्नास खोक्यांची आधीच मी चौकशी करण्याची मागणी केली आहे. यातच इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांची चौकशी करावी लागेल. उद्धव ठाकरे यांनी घेतलेले आता पर्यंतचे खोके कुठे गेलेत ? याचा तपास झाला पाहिजे. यातून खरं काय ते सत्य बाहेर पडेल. असेही रामदास कदम यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा ?” निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ
हेही वाचा…लेकांचं दमदार भाषण ऐकून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…
हेही वा“जो काकाचा, बहिणींचा, काकींचा झाला नाही, तो काय होणार महाराष्ट्राचा ? आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्यात एका दगडात दोन लक्ष्य साधले, मोहोळांना संधी तर मुळीक अन् देवधरांना धक्का
हेही वाचा…कोकणात भाजप अन् ठाकरे गट वाद शिगेला पोहचला, निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक, मोठा राडा