रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे नेते निलेश राणे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या ठिकाणी जात असताना निलेश राणे यांच्या गाड्यावर भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काल मोठा राडा झाला. तर आपल्या सभेतून निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांनी शिवीगाळ केली. त्यावरून आता राज्यातील विरोधकांनी हा भाजपचा मेळावा आहे की गुंडाचा मेळावा आहे. असं म्हणत भास्कर जाधव यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…धनगर समाजाला कोर्टाचा मोठा धक्का, ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी फेटाळली
भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर मोठा राडा झाल्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर आल्या सभेतून निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार शिवीगाळ करत जाहीरपणे धमक्या देखील दिल्या. याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. दोन दिवसापुर्वी भाजपच्या आमदाराने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यावरून आता भाजप नेत्यानी अशा प्रकारे शिवीगाळ करत धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भास्कर जाधव यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न,” शरद पवार गटाची कोर्टात धाव, निर्णय बदलणार ?
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भास्कर जाधव यांना शिवीगाळ करतांनाचा निलेश राणेंचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात भाजपा मेळाव्यात नेत्यांनी केलेली ही भाषणं बघून हा भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा कार्यक्रम आहे असा प्रश्न पडतो. भाजपच्या व्यासपीठावरून झालेल्या या भाषणाची २ मिनिटांची क्लिप अत्यंत बोलकी आहे. राज्यातील जनतेला आणि कायदा सुव्यस्थेला खरा धोका हा भाजपकडून आहे हे चित्र स्पष्ट असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझी मागणी आहे की त्यांनी तातडीने आमदार भास्कर जाधव यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना स्वत: च्या पक्षातील गुंडांपासून संरक्षण द्यावे, भाजपच्या एका आमदाराने पोलीस स्थानकात गोळ्या झाडण्याच्या घटनेला दोन आठवडे उलटत नाही तेच पुन्हा आता इतर भाजपचे नेते थेट व्यासपीठावरून विरोधकांना जीवे मारायची धमकी देत आहे, यावर वेळीच लगाम घातली गेली पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.
भाजपा मेळाव्यात नेत्यांनी केलेली ही भाषणं बघून हा भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा कार्यक्रम आहे असा प्रश्न पडतो!
भाजपच्या व्यासपीठावरून झालेल्या या भाषणाची २ मिनिटांची क्लिप अत्यंत बोलकी आहे. राज्यातील जनतेला आणि कायदा सुव्यवस्थेला खरा धोका हा भाजप कडूनच आहे, हे चित्र… pic.twitter.com/DhJ61EQ5HA
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 17, 2024
READ ALSO :
हेही वाचा…लेकांचं दमदार भाषण ऐकून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…
हेही वा“जो काकाचा, बहिणींचा, काकींचा झाला नाही, तो काय होणार महाराष्ट्राचा ? आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्यात एका दगडात दोन लक्ष्य साधले, मोहोळांना संधी तर मुळीक अन् देवधरांना धक्का
हेही वाचा…कोकणात भाजप अन् ठाकरे गट वाद शिगेला पोहचला, निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक, मोठा राडा
हेही वाचा…“भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले “