मुंबई : अलिकडेच विधानसभा अध्यक्ष आणि निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचा निर्णय दिला. यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाची विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधातील याचिका मान्य केली असून त्यावर लवकरच लवकर सुनावणी घेऊ. असे सांगण्यात आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
हेही वाचा…बारामतीत नणंद-भावजईच्या लढतीचे संकेत, सुनेत्रा पवारांच्या माहितीचा विकास रथ शहरात दाखल
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पक्ष हिरावून निवडणुक आयोगाने शरद पवारांवर अन्याय केला असल्याचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाला सांगितले आहे. शरद पवाराच राष्ट्रवादीचे जन्मदाते आहेत. त्यामुळे त्यावर सुनावणी लवकरात लवकर करावी. त्याआधी त्यांनी यासंदर्भात एक पत्र देखील दिले होते. त्यावर त्यावर सरन्यायाधीश यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे सांगितले आहे.
हेही वाचा…“ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात…?” अजित पवार गटाच्या नेत्याची पार इज्जतच काढली, काका का वाद पेटला
येणाऱ्या २० आणि २६ तारखेला दोन महत्वाचे अधिवेशन आहेत. त्याअधिवेशनाच्या आधी शरद पवारांचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते दुर्दैव असल्याचे सांगत आम्ही यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ असे न्यायाधीशांनी सांगितले आहे. अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार, तसेच शरद पवार गटातील अनेक नेते बाहेर पडणार अशा अफवा देखील पसरवल्या जात असल्याचे आव्हाडांनी सांगितले. परंतु या सगळ्या अफवा कोण पसरवत आहेत. ते आम्हाला माहिती आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. असे म्हणत आव्हाडांनी सुनावलं.
READ ALSO :
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही,” चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
हेही वाचा…अजिदादांनी बारामतीतून लोकसभेचं रणशिंग फुंकलं, सुप्रिया सुळेंना दिले मोठे आव्हान, म्हणाले..
हेही वाचा…“पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न, भयमुक्त पुण्यासाठी”, पुणे लोकसभेसाठी धंगेकर फिक्स? भाजपला घाम फुटणार ?
हेही वाचा…राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने पक्षातीलच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं, कार्यकर्त्यांचा उघडपणे रोष
हेही वाचा…राज्यसभेची उमेदवारी नाकारली, पण हर्षवर्धन पाटलांना भाजपात लागली मोठी लॉटरी, गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच