मुंबई : अलिकडेच राज्यसभेसाठी भाजपने दोन दिवसापुर्वी कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली. भाजपात निष्ठावंत कार्यकर्ते असतांनाही दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना राज्यसभेची संधी दिली अशी खंत आता व्यक्त होऊ लागली आहे. यातच भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची व्यथा त्यांचे सुपुत्र चिन्मय भंडारी यांनी मोठा लेख लिहून व्यक्त केली. यावरून विरोधकांनी देखील भाजपवर सडकून टिका केली. यातच आता भाजपचेच नेते यावरून नाराजी व्यक्त करतांना दिसत आहे.
हेही वाचा…“भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली”, चाकणकरांनी सुळेंना पुन्हा डिवचलं
राज्यात सहा जांगासाठी राज्यसभेची निवडणुक होणार आहे. यासाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या अनेक निष्ठावंतांना डावलून अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये माधव भंडारी यांचे सुपुत्र चिन्मय भंडारी यांनी व्यथा मांडली आहे.
काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अन्य पक्षातील नेते भाजपमध्ये सामील होत पक्षाची ताकद वाढीस लागत आहे. मात्र खरया अर्थाने सतरंजी उचलणारे, झेंडे लावणारे, तळमळीने सर्व समर्पण भाव ठेवून कार्य करणारे दुरावत आहेत. याची पक्ष नेतृत्व दाखल घेईल अशी अपेक्षा भाजपचे प्रवक्ते प्रवीण अलई यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सुपुर्द
तसेच राज्यसभेसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवार यादीत, इतर पक्षातुन आलेल्या थोरा मोठ्यांचा जंगी प्रवेश आणि लागलीच उमेदवारी जाहिर. यामुळे माधव भांडारी यांच्या सारख्या प्रखर निष्ठावान आणि संघटनेच्या कार्यात कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याने, अनेक दुःखदायी घटनाना सामोरे जात सर्व आरोगयाच्या समस्यावर मात करीत, अव्याहत पक्ष कार्य संभाळले आहे. अशा भारतीय जनता पार्टितील तमाम जुन्या जाणत्या, तुरुंगवास सोसलेल्या, लाठ्या काठया झेललेल्या, जीवन व वेळ समर्पित केलेल्या महनीय व्यक्तींचा विचार करावा. असेही प्रवीण अलई यांनी म्हटले आहे.
काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अन्य पक्षातील नेते भाजपमध्ये सामील होत पक्षाची ताकद वाढीस लागत आहे.
मात्र खरया अर्थाने सतरंजी उचलणारे, झेंडे लावणारे, तळमळीने सर्व समर्पण भाव ठेवून कार्य करणारे दुरावत आहेत. याची पक्ष नेतृत्व दाखल घेईल अशी… https://t.co/MUpfU8GhKm
— Pravin Alai (प्रविण अलई) (@PravinAlai) February 16, 2024
READ ALSO :
हेही वाचा…राज्यसभेची उमेदवारी नाकारली, पण हर्षवर्धन पाटलांना भाजपात लागली मोठी लॉटरी, गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच
हेही वाचा…बारामतीत नणंद-भावजईच्या लढतीचे संकेत, सुनेत्रा पवारांच्या माहितीचा विकास रथ शहरात दाखल
हेही वाचा…“ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात…?” अजित पवार गटाच्या नेत्याची पार इज्जतच काढली, काका का वाद पेटला
हेही वाचा…जिल्हा परिषद, कारखाने, पंचायत समिती, आमदार, खासदार असे सर्वच त्यांच्याकडे, मग मराठा मागास कसा काय ? भुजबळांचा सवाल
हेही वाचा…इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभेतून निवडणूक लढवणार, एमआयएमच्या महत्वाच्या बैठकीत निर्णय