मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागासवर्ग आयोगाने अहवाल सोपवला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा एक मार्ग सोप्पा झाला आहे. तर या अहवालावर आता येत्या २० फेब्रुवारी रोजी सरकारच्या विशेष अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे. त्यावर आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण..! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच, शरद पवारांना मोठा धक्का
छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या १५ दिवसात एक कोटी ५८ लाख घरांचं सर्वेक्षण केलं आहे. हा एक विक्रमच आहे. असं म्हणत आणखी १५ दिवस दिले तर संपुर्ण महाराष्ट्राची जनगणनाच होऊन जाईल. असा टोला देखील भुजबळांनी लावला. जेव्हापासून आंदोलन सुरू झालं. तेव्हापासून आयोगाचे एक एक सदस्य गाळले गेलेत. मागासवर्ग आयोगामध्ये एक जण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. उच्च कोर्टाचे वकिल, धनगर समाजाचे नेते, असे सगळे आयोगात आहे. परवा दिवशी ज्यांनी कोर्टात न्यायाधीश म्हणून काम केले. त्यांना देखील सरकारने काढून टाकले.
आम्ही पहिल्यापासून आम्ही सांगत आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. याबाबत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना पहिला प्रयत्न झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दुसरा प्रयत्न केला. त्यात त्यांनी दिलं. परंतु त्यावेळी कोर्टात आरक्षण गेल्याने त्यावर स्थगिती आली. आमची पहिल्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये. अशी आमची भूमिका आहे. तुम्ही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देत असाल तर त्याचा मला पाठिंबा आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा….गिरीश महाजनांचा फोटो ट्विट, “तेव्हा बसेस फोडल्यात, आता विरोधक फोडताय ?” शरद पवार गटाचा हल्लाबोल
यातच खोट्या नोंदी घेऊन ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोलापुरात एका मराठा घरात ८६ कुणबी प्रमाणपत्र दिल्याचे सांगितले. तुम्ही त्यांना वेगळ आरक्षण देत आहात तर तुम्ही दिलेल्या कुणबी प्रमाणपत्र दिले आहेत. त्यांना देऊ नका. कोर्टात त्यांना १२ टक्के आरक्षण मंजूर केलं आहे. तर आमच्या १७ टक्के आरक्षणामध्ये का येत आहेत ? असा सवाल देखील भुजबळांनी यावेळी उपस्थित केला. शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेपण असल्याचा अहवाल दिला आहे. आजही मराठा समाज डोमिनेंट आहे. मग तो सामाजिकदृष्ट्या मागास कसा होईल. मागच्या पाच आयोगाने त्यांनी याबाबत सांगितले आहे. कोर्टाने देखील सांगितले आहे. असेही भुजबळ म्हणाले.
दरम्यान, यातच मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या निकषावर देखील भुजबळांनी बोट ठेवले. पाटील आणि एखादा दलित घेतला तर यामध्ये कोण मागास आहे. त्यामुळे मागासलेपण विचारात घेतलं तर यांचं तुलनात्मकदृष्ट्या विचारत घेतले पाहिजे. जिल्हा परिषद, साखर कारखाने, पंचायत समिती, आमदार, खासदार असे सर्वच त्यांच्याकडे आहे. मग ते मागास कसे काय ? असा सवाल देखील त्यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभेतून निवडणूक लढवणार, एमआयएमच्या महत्वाच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…“भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली”, चाकणकरांनी सुळेंना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सुपुर्द
हेही वाचा…मोहोळ अन् देवधरांचा पत्ता कट होणार, भाजपने पुणे लोकसभेसाठी शोधला दुसराच उमेदवार
हेही वाचा…तेव्हा मग दोन वर्ष काय अंडी उबवत होता का ? जितेंद्र आव्हाडांचा राहुल नार्वेकरांना संतापजनक सवाल