मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधीमंडल बहुमताचा विचार करावा लागला आहे. त्यामुळे सध्या अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ४१ आमदार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे हा शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाबाबत आज राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालाचं वाचन केले. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
हेही वाचा….कॉंग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या, खर्गे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर, तातडीची बोलवली बैठक
राष्ट्रवादी प्रकरणाचं वाचन करतांना राहुल नार्वेकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवड घटनेला धरून केली नाही. असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला आहे. यातच २९ जुन २०२३ पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. परंतु ३० जुन २०२३ रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला. यातच आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंने पुरावे दिले आहेत. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधींच्या पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आलेले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…राज्यसभेचा कार्यकाळ बाकी असतांना प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी का ? कारण आलं समोर
दरम्यान, शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्षाची निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा….गिरीश महाजनांचा फोटो ट्विट, “तेव्हा बसेस फोडल्यात, आता विरोधक फोडताय ?” शरद पवार गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वाचनास सुरूवात, राज्यात आणखी एक मोठी घडमोड
हेही वाचा…“जरांगे पाटलांची तब्येत ढासळली, प्रकृती चिंताजनक..! मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावलं, दिले ‘हे’ आदेश “
हेही वाचा…पक्ष काढलं, चिन्ह काढलं, तरीही निवडणुक लढवली आणि अन् १०१ जागा मिळवल्या, महाराष्ट्रातही बदल होईल का ?
हेही वाचा…“..तर नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीला पुर्णविराम लागणार? “