मुंबई : अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. उपोषणाला आतापर्यंत सहा दिवस झाले असून त्यांनी जेवण आणि पाणी त्याग केला आहे. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त देखील येत आहे. पाणी पिण्याची विनंती करून देखील जरांगे पाटील पाणी घेत नाहीत. यातच काल त्यांना डॉक्टरांनी सलाईन लावली होती. या सर्व गोष्टीवरून मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला महत्वाचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा…“चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात येणार”? अशोक चव्हाणांची ‘ती’ दुसरी अट भाजप मान्य करणार
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटलांना औषध घ्यावेत अशा सुचना कोर्टाने दिल्या. तर जरांगे पाटलांच्या उपचारासाठी दोन डॉक्टर असून त्यांनी काल जरांगे पाटलांना दोनदा सलाईन लावली. यातच जरांगे पाटील डॉक्टरांना सहकार्य करीत नाहीत. अशी माहिती महाधिवक्त्यांनी मुंबई हाय कोर्टात माहिती दिली आहे.
हेही वाचा…“..कारण पुतण्या गद्दार निघाला, २०१९ सारखी आता गद्दारांना माफी नाही,”
यावर उपोषणस्थळी डॉक्टर असणं, सलाईन घेण म्हणजे उपचार घेणं असं होत नाही असं म्हणत कोर्टाने सुनावलं. तसेच उपचार घेण्यात मनोज जरांगे पाटलांना अडचण काय ? असा सवाल कोर्टाने केला. त्याचबरोबर जरांगे पाटलांना औषधोपचार घ्यायला सांगा. रक्त तपासणी त्यांच्या परवानगी शिवाय होणार नाही असेही कोर्टाने सांगितले आहे. तर जरांगेंच्या उपोषणाचा परिणाम म्हणून काल अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाली. असे गुणरत्ने सदावर्ते यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…पक्ष काढलं, चिन्ह काढलं, तरीही निवडणुक लढवली आणि अन् १०१ जागा मिळवल्या, महाराष्ट्रातही बदल होईल का ?
हेही वाचा…“..तर नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीला पुर्णविराम लागणार? “
हेही वाचा….कॉंग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या, खर्गे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर, तातडीची बोलवली बैठक
हेही वाचा…राज्यसभेचा कार्यकाळ बाकी असतांना प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी का ? कारण आलं समोर
हेही वाचा.निवडणुकी आधी कोर्टाचा भाजपला जोरदार झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द