पुणे : आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात आला. त्याचसोबत राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर यांना देखील भाजपने राज्यसभेची पुन्हा संधी दिली नाही. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी यांची वर्णी लागली आहे. यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत राणे विजयी झाले तर ठिक नाही तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पुर्णविराम लागण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २८ फेब्रवारी रोजी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीकरिता भाजपने विद्यमान चार केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेचे तिकीट नाकारले आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे आणि जावडेकर यांना तिकीट दिलं जाणार अशी चर्चा आहे.
हेही वाचा….कुलकर्णी राज्यसभेवर गेल्याने भाजपचा राजकीय गुंता सुटला, पुणे लोकसभेसाठी भाजपचा ‘हा’ उमेदवार ठरला*
पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रकाश जावडेकर, रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून नारायण राणे तर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवू शकतात. यातच आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची मुंबईतून तसेच पियुष गोयल यांची उत्तर किंवा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेना, कॉंग्रेस , स्वाभिमान पक्ष ते भाजप असा प्रवास करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा लोकसभेच्या निवडणुक उतरणार आहेत. सध्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. राणे लोकसभेच्या रिंगणात उतरले तर त्यांना विनायक राऊतांचा सामाना करावा लागणार आहे. राऊत गेल्या दोन वेळा या मतदारसंघातून खासदार आहेत. सध्या पक्ष फुटप्रकरणानंतर जनतेची सहानुभूती ठाकरे गटाकडे गेल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच नारायण राणे यांनी निवडणुक लढविली तर याठिकाणी त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.
हेही वाचा…..राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागणार ? सगळ्यांची उत्सुकता पणाला
दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांंना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचेच सुपुत्र निलेश राणे यांना भाजपकडून उमेदवारी देणे शक्य नाही. तसेच यातच नितेश राणे यांना देखील महायुतीकडून विधानसभेची पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशातच एकाच घरात तीन व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात असल्याने जर यदा कदाचित नारायण राणेंचा पराभव झाला तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पुर्णविराम लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पक्षाच्या ध्येय धोरणानुसार भाजप एकाच घरात तीन व्यक्तींना महत्वाची पदे देणार नसल्याचं दिसून येत आहे.
दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांच्या बदल्यात अशोक चव्हाण यांच्या रूपाने भाजपला मराठा चेहरा मिळाला आहे. यातच उद्धव ठाकरे यांना ट्रॅकल करण्यासाठी नारायण राणे यांना पक्षात घेतलं गेलं. अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे सध्या शिवसेनेत फुट पडल्याने ठाकरे गट बाजूला गेला आहे. यातच आता भाजपला नारायण राणेंची गरज आता कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या राजकीय काररकिर्दीला पुर्णविराम देण्याबाबत हेही कारण तितकचं महत्वाचं वाटू लागलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा….कॉंग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या, खर्गे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर, तातडीची बोलवली बैठक
हेही वाचा…राज्यसभेचा कार्यकाळ बाकी असतांना प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी का ? कारण आलं समोर
हेही वाचा.निवडणुकी आधी कोर्टाचा भाजपला जोरदार झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द
हेही वाचा…“चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात येणार”? अशोक चव्हाणांची ‘ती’ दुसरी अट भाजप मान्य करणार
हेही वाचा…“..कारण पुतण्या गद्दार निघाला, २०१९ सारखी आता गद्दारांना माफी नाही,”