मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने शंभू सीमेवरच रोखलं आहे. ट्रॅक्टरसह, ट्रक्स घेऊन निघालेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने आमानुष पणाची भूमिका घेतली आहे. महामार्गावरच खिळे, तसेच मोठ्या प्रमाणात बॅरिकेट लावले आहेत. तसेच केंद्र सरकारकडून अश्रू धारांच्या नळकांड्या देखील सोडण्यात येत आहे. यावरून देशातील विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे. याच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने याचाच धागा पकडत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…राज्यसभेचा कार्यकाळ बाकी असतांना प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी का ? कारण आलं समोर
२०११ साली भाजपचे मंत्री गिरीश महाजनांनी विरोधक असताना कापसाच्या दरवाढीसाठी अनिश्चित उपोषणाचं ढोंग रचलं होतं. त्या वेळी कापसाचा भाव ६ हजार रुपये होता. पण आज १३ वर्षांनंतरही भाजप सरकारच्या सत्तेत कापसाला तेवढाच भाव आहे, म्हणून जेव्हा शेतकरी सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत. तेव्हा त्यांच्यावर भाजपकडून अनेक अमानुष हल्ले होत आहेत. या सरकारच्या कालावधीत कापसाचा भाव तर वाढला नाही पण शेतीचा खर्च मात्र वाढला. सत्तेसाठी ढोंग करणं योग्य आणि न्यायासाठी आंदोलन करणं वाईट? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा….निवडणुकी आधी कोर्टाचा भाजपला जोरदार झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द
दरम्यान, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाने गिरीश महाजन यांचा फोटो ट्विट करत तेव्हा बसेस फोडल्यात, आता विरोधक फोडताय ? असा जोरदार घणाघात देखील करण्यात आला आहे. तसेच हमी भावासाठी पेटलंय. शेतकऱ्यांचं आंदोलन असेही त्यात सांगण्यात आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वाचनास सुरूवात, राज्यात आणखी एक मोठी घडमोड
हेही वाचा…“जरांगे पाटलांची तब्येत ढासळली, प्रकृती चिंताजनक..! मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावलं, दिले ‘हे’ आदेश “
हेही वाचा…पक्ष काढलं, चिन्ह काढलं, तरीही निवडणुक लढवली आणि अन् १०१ जागा मिळवल्या, महाराष्ट्रातही बदल होईल का ?
हेही वाचा…“..तर नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीला पुर्णविराम लागणार? “
हेही वाचा….कॉंग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या, खर्गे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर, तातडीची बोलवली बैठक