मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रताबाबत सादर केलेल्या दोन्ही गटाच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज फेटाळून लावल्या. तसेच या प्रकरणात अध्यक्षांनी कोणालाही अपात्र ठरवले नाही. तसेच विधानसभेत अजित पवार गटाला ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शरद पवार गटानं केलेल्या या दाव्याला कुठेही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटाचं संख्याबळ विचारत घेऊन मुळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा महत्वाचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यावरून आता विरोधकांनी भाजपसह विधानसभा अध्यक्षांवर जोरदार टिका करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…“..तर नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीला पुर्णविराम लागणार? “
कायद्याची पायमल्ली कशी करायची, याची ट्युशन राहुल नार्वेकर घेऊ शकतात. निवडणूक आयोग म्हणतंय की २०१९ पासून पक्षांतर्गत वाद सुरू झाला. पण अध्यक्ष म्हणतात की २९ जून २०२३ पर्यंत कुठलाही वाद नव्हता. असं आव्हाडांनी म्हटलंय. तसेच आयाराम गयाराम पद्धत रोखण्यासाठी दहावं परिशिष्ट आणण्यात आलं. आधी ५० टक्के सदस्यही बाहेर पडू शकत होते. नंतर हे प्रमाण दोन तृतीयांश केले. हे सगळं असताना अध्यक्ष म्हणतात हे माझ्या अधिकार क्षेत्रात नाही. मग दोन वर्ष काय अंडी उबवत होता का ? असा सवाल आव्हाडांनी नार्वेकर यांना केला आहे.
हेही वाचा….कॉंग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या, खर्गे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर, तातडीची बोलवली बैठक
तीन जुलैला अजित पवार म्हणाले होते की त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवाराच आहेत. मग हे सगळं असताना जर तुम्हाला ते दिसत नसेल तर तुम्ही काय धृतराष्टाच्या भूमिकेत गेला आहात का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच मला निकालाबाबत कोणतीही माहिती नाही. मी त्याबाबत माहिती घेऊन बोलेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण..! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच, शरद पवारांना मोठा धक्का
हेही वाचा….गिरीश महाजनांचा फोटो ट्विट, “तेव्हा बसेस फोडल्यात, आता विरोधक फोडताय ?” शरद पवार गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वाचनास सुरूवात, राज्यात आणखी एक मोठी घडमोड
हेही वाचा…“जरांगे पाटलांची तब्येत ढासळली, प्रकृती चिंताजनक..! मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावलं, दिले ‘हे’ आदेश “
हेही वाचा…पक्ष काढलं, चिन्ह काढलं, तरीही निवडणुक लढवली आणि अन् १०१ जागा मिळवल्या, महाराष्ट्रातही बदल होईल का ?