मुंबई : बारामती मेळाव्यातून अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात एल्गार पुकारला आहे. तसेच बारामती लोकसभेतून आपला उमेदवार निवडून आणायचाच असे देखील अजित पवारांनी सांगितले. तसेच यावेळी अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर टिका करत बारामतीचा विकास झालाच नसल्याचे सांगितले. त्यावर आता शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही,” चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
अजित पवारांनी साहेबांचे नाव वापरून कायम सत्तेचे राजकारण केले आहे. त्यांची बदनामी पक्षाला हानिकारक होती तरी साहेबांनी ती पोटात घातली. एस सी एसटी व ओबीसी या तिघांचे निधी थांबवण्याचे काम कायम अर्थ व नियोजन मंत्री म्हणून अजित पवारांनी केले आहे. असा गंभीर आरोप आव्हाडांनी लावला. तसेच शरद पवार जर नसते तर अजित पवार कुठे असते ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा…अजिदादांनी बारामतीतून लोकसभेचं रणशिंग फुंकलं, सुप्रिया सुळेंना दिले मोठे आव्हान, म्हणाले..
अजित पवारांमुळे कितीजण पक्ष सोडून गेले? हे त्यांनी सांगावे, बात निकलेगी तो दुर तक जाएगी. असं म्हणत साहेबांमुळे चार वेळा उपमुख्यमंत्री पद मिळाले हे उपकार तरी मनात ठेवा, कृतज्ञता तरी व्यक्त करा. इतका कृतघ्न माणुस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाही. अर्थ व नियोजन खात्यासाठी क्रांतिकारक ठरलेली एक योजना अजित पवारांनी सांगावी. असा चॅलेंज देखील आव्हाडांनी अजित पवारांना दिलं.
महाराष्ट्र ताईंचा आपलेपणा ओळखतो म्हणून त्यांच्यासोबत सेल्फी काढतो. जो नाही झाला काकाचा जो नाही झाला बहिणीचा. जो नाही झाला काकींचा तो काय होणार महाराष्ट्राचा ? असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांना सुनावलं.
READ ALSO :
हेही वाचा…कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्यात एका दगडात दोन लक्ष्य साधले, मोहोळांना संधी तर मुळीक अन् देवधरांना धक्का
हेही वाचा…कोकणात भाजप अन् ठाकरे गट वाद शिगेला पोहचला, निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक, मोठा राडा
हेही वाचा…“भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले “
हेही वाचा…धनगर समाजाला कोर्टाचा मोठा धक्का, ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी फेटाळली
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न,” शरद पवार गटाची कोर्टात धाव, निर्णय बदलणार ?