मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची धग जोरपण तेवत चालली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार महत्वाची पाऊले उचलतांना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात धनगर आरक्षणाचाही मुद्दा गाजत चालला आहे. यातच आता मुंबई उच्च न्यायालयात धनगर आरक्षणासंदर्भात महत्वाची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने दिलेल्या निर्णयाने धनगर समाजाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…राज्यसभेची उमेदवारी नाकारली, पण हर्षवर्धन पाटलांना भाजपात लागली मोठी लॉटरी, गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या अपेक्षआंना सुरूंग लागला आहे.
हेही वाचा…बारामतीत नणंद-भावजईच्या लढतीचे संकेत, सुनेत्रा पवारांच्या माहितीचा विकास रथ शहरात दाखल
दरम्यान, अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून धनगर समाजाने आंदोलन आणि मोर्चे काढले आहेत. सध्या धनगर समाजाला एनटी प्रवर्गाचे साडेतीन टक्क्यांचे आरक्षण आहे. एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले असते तर धनगर समाजाचे आरक्षण ७ टक्क्यांवर गेले असते. मात्र धनगर समाजाला अनुसुचित जमातींचे आरक्षण देण्यासाठी पुर्तता आणि पडताळणीचे निकष पुर्ण होत नस्याचे कारण देत न्यायमुर्ती गौतम पटेल आणि न्यायमुर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.
यातच धनगर समाजाची एसटीतून आरक्षण देण्याची मागणी रास्त नाही. ती मान्य करता येणार नाही. असेही निरक्षण खंडपाठीने नोंदविले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न,” शरद पवार गटाची कोर्टात धाव, निर्णय बदलणार ?
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही,” चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
हेही वाचा…अजिदादांनी बारामतीतून लोकसभेचं रणशिंग फुंकलं, सुप्रिया सुळेंना दिले मोठे आव्हान, म्हणाले..
हेही वाचा…“पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न, भयमुक्त पुण्यासाठी”, पुणे लोकसभेसाठी धंगेकर फिक्स? भाजपला घाम फुटणार ?
हेही वाचा…राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने पक्षातीलच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं, कार्यकर्त्यांचा उघडपणे रोष