रायगड : आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण इतर कोणात्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ही भूमिका प्रत्येकांची आहे. आज आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरण्याचे काम होत असताना जनतेलाही वेठीस धरण्याचे काम होत आहे. असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर केला आहे. कर्जत येथे अजित पवार गटाचा चिंतन शिबिर होता. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“जयंत पाटलांनी घाण करायची अन् अजित पवारांनी साफ करायची”, त्यामुळेच राष्ट्रवादीचा ‘हा’आमदार भडकला
पुढे बोलतांना ते म्हणाले की, राज्यकर्ता हा सगळ्यांचा असतो तो कोणत्याही एका समाजाचा नसतो. त्यामुळे सगळ्यांना समान न्याय मिळायला हवा. जर कोणावर अन्याय होत असेल तर आपण गप्प बसून कसे चालेल. घरांवर हल्ले होत असलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्याला सर्व जाती, धर्मांना, शिवरायांनी घडविलेल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे, असे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा…आढळराव पाटील अजित गटात प्रवेश करणार अन् कोल्हेंच्या विरोधात निवडणुक लढणार ? लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनिती ठरली
दरम्यान, सध्या पक्षाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असली तरी न्याय आपल्याच बाजूने होईल आणि निश्चितपण आपला विजय होईल हा विश्वास आहे. आता आपण कार्यालयात येण्याऐवजी गावपातळीवर, शहरपातळीवर पक्षाची पाळमूळ घट्ट रोवली पाहिजे. अडचणीत आलेल्या लोकांसाठी काम करणे हे आपले काम आहे, असे भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही राज्यातील जनतेच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त आमदार, खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील. त्यासाठी आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाची ‘ती’ मागणी नार्वेकरांनी फेटाळली, सत्तासंघर्षाची सुनावणी २२ तारखेपर्यंतच होणार
हेही वाचा…“..त्यामुळेच अनिल देशमुखांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळलं,” अजित पवारांनी केला मोठा दावा
हेही वाचा…फडणवीसांनी लोकसभेच्या जागांचा अगोदरच जाहीर केलाय आकडा, अजित पवारांनी आज ४ जागा फिक्स केल्या, शिंदेंच्या वाट्याला किती?
हेही वाचा…अजितदादांचा गट बारामतीची जागा लढविणार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…
हेही वाचा…“तर दोघांना खाली लोळवलं असतं”, जामीन मंजूर होताच दत्ता दळवींनी दिला इशारा