सांगली : अलीकडेच झालेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने जोरदार कामगिरी केली आहे. त्यानंतर आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने हालचाल सुरू केली आहे. सांगलीमध्ये भाजपचे दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहे. लवकरच या दोन नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
महावितरणाविरोधात आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. तसंच नबाव मलिक यांनीही तशी शक्यता बोलूनही दाखवली आहे. अखेर जयंत पाटील यांच्या सांगलीत लवकरच भाजपचा करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्ह आहे.
महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे दोन माजी आमदार हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयारी केली आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल राष्ट्रवादीने कमालीची गुप्तता बाळगली आहे. लवकरच त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून उघडणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील आणि शिराळयाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक या चार पैकी 2 आमदारांच्या नावाची चर्चा रंगली आहे.विशेष म्हणजे, हे दोन्ही माजी आमदार आधी राष्ट्रवादीमध्ये होते. २०१९ च्या निवडणुकीच्या दरम्यान या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची एकाप्रकार घरवापसी होणार आहे. त्यामुळे हे दोन नेते कोण आहे, याबद्दल सांगलीमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आहे.
Read also:
- गोव्यात सत्ता तर भाजपचीचं येणार, मनात मांडे खाऊ नका – चंद्रकांत पाटील
- ‘मायकल लोबो कचरा घेऊन काँग्रेसमध्ये गेलेत, त्यांच्या हाती फक्त राखच येणार’
- आयोगाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला लावा अन्यथा गंभीर परिणाम; पडळकरांचा सरकारला इशारा
- पहिले तुम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव मंजूर करा; उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा
- ‘लोबो यांना आम्ही मंत्री केले मात्र मंत्रिपदाचा योग्य वापर ते विकासासाठी करू शकले नाहीत’