पुणे : मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्रातही लागू होण्याबाबत राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. याविषयी तात्काळ विधि व न्याय खाते, ग्रामविकास खाते तसेच इतर संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असल्याचे अजितदादांनी सांगितले.
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे ही इच्छा केवळ राज्य सरकारची नसून सर्व पक्षांची आहे. त्यामुळे विधानसभेत ग्रामविकास व नगर विकास खात्याची विधेयके आणल्यानंतर त्यात राजकारण न येता सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. मागासवर्गीय समाजाला नेतृत्व मिळाले आहे तसेच नेतृत्व ओबीसी समाजाला मिळायला हवे. तो त्यांचा अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत विधानसभेतही निर्णय घेण्यात आला आहे. यावर राज्यापालांची देखील सही झाली असून त्यावर अजून सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवला नाही, असंही अजित पवार म्हणाले.
“महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देऊ”; सुप्रिया सुळे संतापल्या
महाराष्ट्रासाठी निकाल थोडा वेगळा लागल्याने राज्य सरकारवर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीद्वारे ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम सुरु आहे. बांठीया कमिशनचा अहवाल ज्यावेळी सादर होईल तेव्हा मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्र सरकारही सर्वोच्च न्यायालयापुढे आपली भूमिका मांडेल. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे, ‘प्रयत्नांती परमेश्वर’, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.
“OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”
या पत्रकार परिषदेला महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के, औरंगाबाद जिल्हा परिषद माजी सभापती मारुती साळवे उपस्थित होते.
Read also:
- “एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
- “पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
- “महापालिकेच्या कुठल्याही वार्डात निवडणुक लढवून दाखवावी”; चित्रा वाघ यांना विद्या चव्हाण यांचं खुलं आव्हान
- “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले, भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले”
- राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना